वर्धा प्रतिनिधी
भारत राष्ट्र समिती, महाराष्ट्र तर्फे छत्रपती संभाजी नगर ला जांबिदा मैदान छत्रपती संभाजी नगर ला संध्याकाळी ०६ वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.
नांदेड मध्ये दोन सभेचे भव्य आयोजना नंतर मा. के.चंद्रशेखर राव
यांची हि महाराष्ट्र मध्ये ३री सभा. आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रवेशा नंतर हि सभा आयोजित करण्यात आली आहे.
१४ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ फूट उंच प्रतिमेचे उदघाटन मा. के.चंद्रशेखर राव यांनी वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर च्या हातून करून एक नवीन समीकरण महाराष्ट्र मध्ये येईल का याचे सुतोवाच जणू दिले आहे. भविष्यात वंचित आणि BRS याची युती होणार का ते पाहणे उत्सुकता ठरेल.
या सभेत महाराष्ट्र मधल्या शेतकरी संघटना चे पदाधिकारी, तसेच ईतर पक्षातील पदाधिकारी मोठया प्रमाणात प्रवेश घेतील अशी माहिती वर्धा जिल्हा समन्वयक मनीष नांदे यांनी दिली. तसेच या सभेला पूर्ण देशभरात जाळे असले ला संघर्ष ड्राइवर ग्रुप चे संस्थापक श्री संजय हळनोर हे आपल्या समर्थका सोबत प्रवेश करणार आहे.
याचे पडसाद वर्धा मध्ये पण पडणार असून संघर्ष ड्राइवर संघटना वर्धा चे जिल्हाध्यक्ष संदीप सावरकर आणि ईतर पदाधिकारी यांनी संपूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.
तसेच शेतकरी संघटना चे अनेक पदाधिकारी,सामाजिक संघटना,ईतर पक्षाचे कार्यकर्ते संपर्कात असल्याची माहिती आकाश सुखदेवे भारत राष्ट्र समिती, वर्धा यांनी दिली. याचा परिणाम वर्धेचा राजकारणावर निश्चित च होईल.