पंढरपूर प्रतिनिधी
शासनाकडून निरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना आकारण्यात आलेली वाढीव पाणी पटटी तात्काळ रदद करुन पुर्वीप्रमाणे पाणी पटटी आकारण्यात यावी अशी मागणी मुंबई येथे सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचेकडे सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली. यावेळी सोलापुर जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते.
निरा उजवा कालवा विभाग फलटण कडून पंढरपूर तालुक्यातील गावांना सिंचन पुरवठा होतो. कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे अस्थाविस्त झालेला शेतकरी अजुन त्यातुन बाहेर निघत नाही तो पर्यंत शासनाकडून निरा उजवा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुर्वीपेक्षा चौपट पाणी पटटी आकारून बळीराजा शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न जाणून बुजुन प्रशासन करीत आहे. बळीराजा शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे.
शेतकरी पुर्वीप्रमाणेच आकारलेल्या पाणी पटटी भरण्यास तयार असून वाढीव पाणी पटटी आल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन निरा उजवा कालवा लाभक्षेत्र यांचेकडून आकारण्यात आलेली चौपट पाणी पटटी रदद होवून पुर्वी प्रमाणे पाणी पटटी आकारुन बळीराजा शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे चेअरमन कल्याणराव काळे केली.