रात्रभर या संगमावर आंदोलन सुरू आहे
वर्धा प्रतिनिधी
दिंडोदा बॅरेज ग्रस्त यवतमाळ,चंद्रपूर, वर्धा गावातील बाधीत गावक-यांचा बैलबंडी मोर्चा. महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या आहेत.या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व सहभागी होण्यास ज्ञानेश्वर रक्षक-गुरुदेव सेवा मंडळ, दिनानाथ वाघमारे व मुकुंद अडेवार-विमुक्त भटके संघर्ष समिती,समीक्षा गणवीर व मी -प्रभू राजगडकर .
* हा बैलबंडी मोर्चा आज रात्रभर वर्धा नदी किनारी मुक्कामी राहणार असून भजने ,गाणी,क्रांती गीत सादर होणार आहे.रात्री नदी पात्रात दिवे लावून व सकाळी मानवी साखळी करून तीव्र लढ्याचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
* सरकार कडे मागणी एवढीच आहे 1:जमिनीला नव्या कायद्या प्रमाणे भाव मिळावा, 2:योग्य पुनर्वसन-जनावरासह, 3:मच्छीमार, 4:शेतमजूर यांना योग्य पॅकेज.
* हयामागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा संकल्प केला आहे.
* हे बॅरेज भद्रावती येथे १९९३ मध्ये होवू घातलेल्या निप्पोन डेनरो साठी होणार होते.पण निप्पोन डेनरो रद्द झाले.अन दिंडोदा बॅरेज थंड बस्त्यात गेले.मग एकदम २०१७ ला हा प्रकल्प सिंचन प्रकल्प म्हणून जाहिर झाला.आज या प्रकल्पाची किंमत चवदाशे कोटी झाली आहे.
पण शेतक-यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला, योग्य पुनर्वसन, मच्छीमार, शेतमजुरांना योग्य पॅकेज ,ही बाधीत ३२ गावाची -तीनही जिल्ह्यातील मागणी आहे.
सरकार तातडीने लक्ष घालावे व ३२ गावाच्या लोकांना न्याय द्यावा एवढी साधी मागणी आहे.
● सध्या अधिवेशन सुरु आहे.तेव्हा तिनही कलेक्टर ने नोंद घेऊन सरकारला तातडीने कळवावे.
*लढेंगे....जितेंगे*
असे म्हणत आज लोक मुलाबाळांसह,बैलगाड्या सह लहान गोरे -वासरा सह वर्धा नदीकिनारी एकत्र आले आहे.
नेतृत्व करीत आहे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त - विस्थापित लोक लढ्याचे प्रमुख: विलास भोंगाडे,दिंडोदा प्रकल्पग्रस्ताचे नेते अभिजित मांडेकर सावंगी
तह: मारेगाव व पुंडलिक तिजारे ,शेकापूर (बाई)
तह: हिंगणघाट हे करीत आहे.आज आम्ही सर्व बैलबंड्यासह रात्रभर वर्धा नदी किनारी मुक्कामी राहणार आहोत.
मुकुंद अडेवार
सामाजिक कार्यकर्ते,वर्धा नदी किनार