सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा कृषी महोत्सवास अभिजित पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.आणि स्टॉल धारक व शेतकरी यांच्याची चर्चा केली.
विविध भागातील शेतकरी बांधवांशी शेती विषयक बाबींवर चर्चा झाली. तसेच स्टाॅलधारक व युवकांशी देखील संवाद साधला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व प्रकल्प संचालक आत्मा, सोलापूर यांच्या वतीने आयोजित कृषी महोत्सव अनेक शेतकरी बांधवांच्या पुढील वाटचालीसाठी लाभदायक ठरेल हा विश्वास आहे.
जिल्ह्यातील सर्व युवा शेतकऱ्यांनी या शिबिरास अवश्य भेट द्यावी असेही विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले.