भाई मिर्लेकर जोगेश्वरी प्रतिनिधी
मुंबई मध्ये ठिकठिकाणी उकिरड्यावर किवा कचरा गोळा होतो.त्याठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्या लाखोंच्या संख्येत पाहायला मिळतात.
टाकाऊ खाद्यपदार्थ अशा पातळ झबला प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून कचऱ्यात टाकलेले असतात आणि हे खाण्यासाठी भटकी कुत्री, गाई तसेच कावळे इत्यादी प्राणी प्लॅस्टिकच्या पिशव्यामधील अन्नपदार्थ खाता खाता प्लास्टिक पण त्यांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊन कित्येक प्राण्यांनी आपला जीव गामावल्याचे आपण बातम्यांमध्ये पाहतो, वाचतो आहोत.
ठाकरे सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर बंदी आणून पुष्कळ प्रमाणात प्लॅस्टिकच्या वापरावर नियंत्रण आणले होते.परंतु सध्याचे शिंदे - फडणवीस सरकारला या समस्येकडे बघण्यासाठी वेळ मिळत नाही असेच दिसते आहे.