पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी तथा श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये मराठी साहित्य क्षेत्रात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक, प्रसिद्ध मराठी कवी, लेखक, नाटककार विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात आला.
प्रारंभी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे विभागप्रमुख प्रा. यशपाल खेडकर यांनी ‘मराठी राजभाषा दिना’चे महत्व विशद करताना म्हणाले की, ‘कुसुमाग्रजांच्या मराठीतील साहित्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताबाहेर देखील मराठी भाषेला महत्व प्राप्त झाले आहे. अनेक मराठी साहित्यिकांनी आपल्या साहित्यातील लेखनातून मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहचवली आहे.
आज मातृभाषेमुळेच मनातील भावना अधिक उत्कटपणे व्यक्त करता येतात. जागतिक ज्ञान भाषेतील इंग्रजी व मराठी यांच्यातील दरी कमी होणे आवश्यक असून मराठी भाषा अधिक समृद्ध झाली पाहिजे.’ यावेळी प्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णी, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व वैष्णवी काळे, इरफान सय्यद, निनाद काळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.