वर्धा प्रतिनिधी आकाश सुखदेवे
संशोधक समिती आणि निराकरण समिती यांनी समविचारी लोंकाना जुडण्याचे केले आव्हान आजपर्यंत प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील त्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत लक्षणीय प्रमाणात जास्त असल्याचे निदर्शनास येते. कर्जमाफी हे यावर उपाय नाही.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बरे दिवस दिसावेत असे राज्यकर्त्यांना वाटत असेल तर पाणी, वीज आणि हमी भाव या तीन सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे.
बेमोसमी पाऊस झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे एक नैसर्गिक आपत्ती असल्याने यापासून पिकांचे संरक्षण करता येत नाही. यावर उपाय म्हणून पिकांचा विमा योजना काढणे.
बेमोसमी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.तसेच पाऊस न पडल्याने देखील पिकांचे नुकसान होते. त्यावर उपाय शोधणे.
ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ यातून सुरक्षित वाढलेले पीक बाजारपेठेतील विकताना, बाजारभावात होणारी घसरण शेतकऱ्याला अडचण निर्माण करतात त्यावर उपाय शोधणे.
शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज,परतफेडीची मुदत निर्यातीतील होणारे शासकीय बदल ,ऊन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां समस्यांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा शेतकरी सर्वांना लागणारे अन्नधान्य पिकवतो.त्याला त्याच्या उत्पनाचा योग्य मोबदला मिळवून देने.
शेतीत उत्तम पीक घेण्यासाठी सुपीक जमीन आवश्यक असते. त्यासाठी जमिनीची वेळेवर मशागत करणे. पीक चांगले यावे, म्हणून खतांचा योग्य वापर करणे.रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करून सेंद्रिय खतांचा वापर करण्यावर भर देने. तसेच सेंद्रीय शेती करिता शेतकऱ्यांना जागृत आणि उत्साहित करने.
मातीचा कस वाढवण्यासाठी हंगामी आणि विविध पीक घेतले पाहिजे. योग्य नियोजित पिकांची लागवड करून मातीचा कसं वाढविणे.
तसेच शासकीय योजनाचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला सहज रित्या आणि खरोखर रित्या उपलब्ध करून देने अशी कल्याणत्मक भूमिका घेऊन प्रशांत अवचट, राहुल मून, नंदू मून, आकाश सुखदेवे या सामाजिक चळवळीत कार्य करीत असणारे तरुणांनी एकत्र येऊन विदर्भ शेतकरी संघटना ची शिवजयंती निमित्य स्थापना केली.
अडीच वर्षांत राज्यातील सहा हजार ५८९ नी आत्महत्या केल्या आहे. हा आकडा खुप धक्कादायक आहे. हे प्रमाण कमी करण्यात साठी शासकीय पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. त्या उपाय योजनाचा शेतकऱ्यांना खरोखर रित्या मदत व्हावी या साठी अक्षरशः त्यांच्या बांधा पर्यंत जायचे प्रण विदर्भ शेतकरी संघटना च्या माध्यमातून करनार असे या तरुणांचे मत आहे.
तसेच ज्येष्ठ, तज्ञ्, शेती विशारद अनुभवी प्रत्येकी ०८ लोंकाची संशोधक समिती आणि निराकारण समितीची स्थापना करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ समाजसेवक आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये परिचित रुग्णमित्र श्री गजूभाऊ कुबडे, कृषि अधिकारी शुभ्रकांत भगत, कळंब यवतमाळ,राजेंद्र जी झापर्डे, चंद्रपूर प्रगतशील शेतकरी प्रतिनिधी,रत्नाकर जी कावळे, ज्येष्ठ शेतकरी प्रतिनिधी, संदीप सावरकर जिल्हाध्यक्ष संघर्ष ड्राइवर ग्रुप हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा अतुल शेंडे हे होते.
कार्यक्रमाचे संचालन सह्याद्रीचे राखणदार या वृतपत्राचे चे संपादक प्रशांत अवचट यांनी केले तसेच आभार प्रदर्शन visionindia24 NEWS che सह संपादक आकाश सुखदेवे यांनी केले.
या कार्यक्रमाला बहुजन पँथर चे प्रदेशाध्यक्ष विशाल भुरे, महिला जिल्हाध्यक्ष वनिता पाटील, जिल्हा महासचिव पवन महाकाळकर, मुरलीधर दरणे, मनोज धोबे, रत्नाकर अवचट,संघर्ष ड्राइवर ग्रुप चे राकेश बागडे, कुणबी मराठा महासंघ चे शहराध्यक्ष अनिकेत शिंदे तसेच समाजसेविका अंजुताई जिंदे,पारस बाबुळकर,आमोद खडकाळे,विपुल मून,अमित भित्रे आणि शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.