जूना प्रभाग ०७ मनोहर नगर येथे "हात से हात जोडो" अभियान कार्यक्रम संपन्न
सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिवाजी साळुंखे यांनी सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या अध्यक्षेतेखाली जुना प्रभाग क्रमांक ०७ मनोहर नगर, भागवत चाळी समोर निराळे वस्ती रोड येथे "हात से हात जोडो" अभियानाची महत्वाची बैठक आयोजित केली होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक शिवाजी साळुंखे यांनी केले.
यावेळी बोलताना अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, केंद्रातील भाजपा सरकार आणि राज्यातील शिंदे फड़नवीस खोके सरकारचा भ्रस्टाचार, मोदींचे उद्योगपती मित्र अदानी आणि इतरांकडून जनतेच्या पैश्यावर घेतलेला लाखो कोटीचा दारोडा, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दरवाढ, अन्नधान्यावर लावलेला GST कर, आगामी निवडणुका आणि त्यासाठी पक्षाची रणनीती, भारत जोडो चा आणि राहुलजी गांधी यांचा संदेश असलेला पत्र, तसेच सोलापुर महापालिकेतील भाजपचा भोंगळ कारभार, रेशनवर धान्य मिळत नाही, निरादारांना पेंशन मिळत नाही, पाच ते सहा दिवसाआड़ होणारा पाणीपुरवठा, महापालिकेकडून करण्यात आलेला करवाढ, झोपड़पट्टी भागातील सार्वजनिक नळ कनेक्शन कट करणे, वीज बिलात दरवाढ, रस्ते, दिवाबत्ती, इतर प्रश्न घेऊन सोलापुर शहरातील, प्रभागात, प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरोघरी पोहोचविण्यासाठी माणसे जोडणे महत्वाचे आहे. म्हणुन "हात से हात जोडो अभियान राबविण्यात येत आहे असे सांगितले. आज रोजी श्री. शिवाजी साळुंखे यांनी गोरगरीब, कष्ठकरी, सर्वसामान्य माणसे राहत असलेल्या भागात अतिशय चांगली बैठक घेतली त्यामुळे काँग्रेस पक्षाचे धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यामुळे त्यांचे आभार मानतो.
या "हात से हात जोडो" कार्यक्रमात शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, मा. नगरसेवक विनोद भोसले, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास बाबा करगुळे, माजी नगरसेवक NK क्षीरसागर, अंबादास गुत्तिकोंडा, प्रदेश युवक सरचिटणीस प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, मध्य अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, भीमाशंकर टेकाळे, लक्ष्मीकांत साका, तिरुपती परकीपंडला, इलियास शेख, विवेक कन्ना, चक्रपाणी गज्जम, अप्पासाहेब बगले, संजय गायकवाड़, VD गायकवाड़, शकील शेख, दीनानाथ शेळके, सोहेल कुरेशी, नूर अहमद नालवार, वसिष्ठ सोनकांबले, शोहेब महागामी, कुणाल गायकवाड़, महेंद्र शिंदे, धीरज खंदारे, नागनाथ शावने, बसवराज कोळी, विकास येळेगावकर, चंदू नाईक, श्रीकांत दासरी, आदित्य म्हमाने, सुमन जाधव, शोभा बोबे, शाहु सलगर, कमरुनिस्सा बागवान, प्रमिला तुपलवंडे, अरुणा वर्मा, नीता बनसोडे, शिल्पा चांदणे, प्राजक्ता घाटे, मनीषा भोसले, सविता सोनवणे, बबलु जाधव, मुमताज शेख, सुनीता बेरा, चंदा काळे, अर्चना गायकवाड, राहुल पाटील, रेखा बिनेकर, मनोहर चकोलेकर, संगप्पा कलशेट्टी, किशोर गायकवाड़, सुनील डवने, लक्ष्मण म्हेत्रे, तनवीर शेख, राजू काटकर, अश्विनी गायकवाड, उमा शिंदे, मनीषा साळुंखे, रानी केतरे, श्रुती चव्हाण, नामदेव पाटील, जीजाबाई ऐनाळे, शकुबाई वाघमारे, जनाबाई वाघमोड़े, शोभा चव्हाण, यल्लुताई गूंजाळ, संजीवनी देवकुळे, संगीता ठाकुर, इकारून शेख, सचिन घोड़के, विनोद माने, नागेश वाडेद, महमद जमादार, रवि शिंदे, संजय राठोड, मनोज राठोड यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधु भगिनी मोठ्या उपस्तित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी तर आभार प्रवीण जाधव यांनी मानले.