पंढरपूर प्रतिनिधी
भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्र्वराज महाडिक यांनी शासनाच्या उपक्रमांतर्गत 15 अंगणवाड्या दत्तक घेतल्या. महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकार आणि भागीरथी संस्था यांच्यात याबाबतीतला सामंजस्य करार नुकताच पार पडला. दत्तक घेतलेल्या अंगणवाड्यांच्या भौतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधांसाठी येणारा सर्व खर्च विश्वराज महाडिक आणि भागीरथी संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सर्व सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवल्या जाव्यात हा यापाठीमागचा उद्देश आहे. एका अंगणाडीला स्मार्ट बनवण्यासाठी साधारणतः ३-५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.
'भागीरथी संस्थेच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. त्यामध्ये आणखी एक उपक्रम ऍड झाला आहे. दत्तक घेतलेल्या अंगणवाडी स्मार्ट बनवण्यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालणार आहे. कारण ग्रामीण भागातील मुलं शिकली तर राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत भर पडणार आहे. महाराष्ट्र सरकारचा हा अतिशय चांगला उपक्रम असून यासाठी बाकीच्यांनीही समोर यावे' असे आवाहन यावेळी विश्वराज महाडिक यांनी केले.