पंढरपूर प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे इयत्ता बारावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे, म्हणून रयत शिक्षण संस्था सहाय्यक विभागीय अधकारी, पश्चिम विभाग पुणे प्रा.एस. टी. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाताना सकारात्मक दृष्टीकोण समोर ठेवून परीक्षेला सामोरे जावे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर उच्च ध्येय मनाशी बाळगून सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केल्यास यशाचे शिखर सर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. जर जीवनात अपयश आलेच तर खचून न जाता नव्या जोमाने पुन्हा अपयशावरती मात करावी, वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा यथोचित प्रयत्न प्रमुख पाहुण्यांनी आपल्या उद्बोधन कौशल्याच्या आधारे प्रयत्न केला.शिक्षणाबरोबरच आपल्या कडे असणाऱ्या कलागुणांना वाव द्यावी. असेही प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे कार्यकुशल, अभ्यासू प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्व जाणून घ्यावे, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वेळेचे नियोजन केल्यास कोणतीही गोष्ट जीवनात अशक्य नाही असे त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. राहुल मुसळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.हेमंत गाव्हाने यांनी केले. कार्यक्रमास जूनियर विभागाचे उपप्राचार्य शिंदे बी. आर.सुपरवायझर प्रा. युवराज अवताडे व महाविद्यालयातील आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व एमसीव्हीसी विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक नरवडे एस. डी.यांनी मानले.