सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री. भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने परमपूज्य गुरुवर्य श्री. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या ६७ व्या पुण्यतिथीनिमित्त धोत्री गावातून सवाद्य मिरवणुक काढण्यात आली.
प्रथम श्री. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पालखीचे व प्रतिमेचे तसेच बैलगाडीतील वीरतपस्वींच्या प्रतिमेचे व श्री तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे मंत्रोपचार विधिवत पूजन, शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री गुरुमोर्ती पाटील साहेब,शिवशरण बिराजदार सर,श्री विठ्ठल रामपुरे सर, ज्येष्ठ प्रतिष्ठित प्रमुख अतिथी श्री.ईरप्पा पाटील साहेब,श्री. भिमशा पाटील साहेब,सेवानिवृत्त हवालदार श्री. लक्ष्मण बिराजदार साहेब,ग्रामपंचायत सदस्य श्री.सूर्यकांत यारगले साहेब,श्री. शांताय्या स्वामी, माजी पर्यवेक्षक राजकुमार पाटील सर,माजी मुख्याध्यापक चौगुले सर,पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सौ.सरोजिनी यारगले मॅडम, सदस्य श्री.लक्ष्मण बिराजदार साहेब, प्राचार्य श्री. केदार माळी सर,पर्यवेक्षक श्री.रामेश्वर झाडे सर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती यांच्या शुभहस्ते करण्यात आले.वीरतपस्वी गीत मंचातील विद्यार्थीनीने महामंगल आरती म्हंटले.
प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी सर यांनी परमपूज्य गुरुवर्य श्री.वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले तदनंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.मिरवणुकीत सदभक्तगण वीरतपस्वी पालखीचे व बैलगाडीतील वीरतपस्वींच्या प्रतिमेचे दर्शन घेत होते.ठिकठिकाणी महिला सदभक्तगण वीरतपस्वींच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन श्रीफळ वाढवून,मंगलारती करित आशीर्वाद घेत होते.
मिरवणुकीत शिरेवर मंगल कुंभकलश घेतलेल्या विद्यार्थीनी व लेझीम पथक खूपच आकर्षक दिसत होते.सदर मिरवणूकीत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेतले होते.श्रीक्षेत्र धोत्री गावातील सदभक्त श्री.सचिन बाहुबली सगरे,श्री मल्लय्या मठपती, श्री. विजयकुमार नवले व समस्त माळी समाज यांच्याकडून लाडू जिलेबी व शिरा प्रसादाचे सर्वच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
मिरवणुक यशस्वी होण्यासाठी शालेय समितीचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित मान्यवर सदभक्त मंडळी,श्री.भगवती गौरीमाता शिक्षण संकुलातील सर्व प्राध्यापक,शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी गण व युवक मंडळी आदींनी परिश्रम घेतले.मिरवणुकीची सांगता प्रसाद वाटपाने झाली.