डोंबिवली प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ३५वर्षे कुष्णरोग्यांसाठी सेवा करणारे डोंबिवलीतील गजानन माने यांना केंद्र शासनाकडुन पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे.गजानन माने यांनी काही वर्षे प्रायव्हेट नोकरी करुन नंतर १२वर्षे नौदलात देशसेवा करून निवृत्त झाल्यावर ३५वर्षे कुष्णरोग्यांच्या समाजसेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घातले.पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचा सार्थ अभिमान डोंबिवलीकरांना आहेच.जनजागृती सेवा समितीला आहे.त्याच अनुषंगाने नुकताच डोंबिवलीतील जनजागृती सेवा समितीच्या पदाधिका-यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला.
याप्रसंगी संस्थेचे खजिनदार दत्ता कडुलकर,सहखजिनदार सौ.श्रुती उरणकर,सल्लागार आत्माराम नाटेकर,जनजागृतीच्या ग्रुप सदस्या सौ.सुनिता मिश्रा,सौ.सविता ठाकुर हे उपस्थित होते.
गजानन माने यांनी कुष्णरोग्यांसाठी केलेल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल केडीएमसीने राज्य शासनाकडे विशेष ठरावाच्या माध्यमातून २०१७साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी शिफारस केली होती.त्यांच्या या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात त्यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याचा आनंद जनजागृती सेवा समितीला आहेच,म्हणूनच त्यांचे अभिनंदन व सत्काराचा योग संस्थेला आला आणि तो सत्कार पदाधिका-यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला त्याबद्दल आभार.
गजानन माने याच्याकडे ३५वर्षे कुष्णरोग्यांच्या माध्यमातून समाजसेवेचा वारसा त्यांच्याकडे आहेच.त्याखेरीज कुष्ठरोग वसाहतीत स्वतंत्र दवाखाना,रोजगार उपलब्ध करुन देणे,कुष्णरोग्यांच्या कुटुंबातील २५ते ३०जणांना केडीएमसीत नोकरी लावली.
महिलांना स्वतंत्र रोजगार मिळवुन दिला.असे त्यांचे सर्वच स्तरावर समाजउपयोगी कार्य आहे.गजानन माने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन,कौतुक व सत्कार होत आहेत.