सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथील गड्डेप्पा काळे कुटूंबातील दोन कर्त्यांची अचानक निधन झाल्याने पुर्णतः खचून गेलेल्या वय वर्षे ७० ओलांडलेल्या आजी-आजोबावर हत्तूरच्या जन सेवा हिच ईश्वर सेवा या सामाजिक संस्थेने दवाखान्याच्या खर्चासाठी दहा हजार रुपयांचे धनादेश व महिनाभराचे किराणा साहित्य देऊन मदतीचा आधार दिला.
जन सेवा हिच ईश्वर सेवा या सामाजिक संस्थेतील कार्यकर्त्यांना राजूर येथील गड्डेप्पा काळे कुटुंबाचे व्यथा समजली. पुर्णतः खचून गेलेल्या आजी आजोबांना गावातील सरपंच, उपसरपंच, फाऊंडेशनचे स्वयंसेवकांसह काहीं प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या सोबत भेटून अन्नधान्याचे किट देण्यात आले. १० किलो गहू, १० किलो तांदूळ, २ किलो तेल, ४ किलो साखर, २ किलो तुरदाळ, २ किलो हरभरा दाळ,२ किलो रवा, अर्धा किलो चहापत्ती, २ किलो मीठ, हळद, जीरे- मोहरी, तिखट, २ कपड्याचे साबण, ४ आंघोळीचे साबण, ८ बिस्किटाच्या पुड्या आदी साहित्य देण्यात आले तसेच दवाखान्याच्या खर्चासाठी दहा हजार रुपयांचे धनादेश उपस्थित गावकऱ्यांच्यां हस्ते कुटुंबाला देण्यात आली.आजी आजोबांना प्रत्येक महिन्याला अन्नधान्य देण्यात येईल असे अध्यक्ष राघवेंद्र पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच लक्ष्मण गडदे, उपसरपंच सतीश देवकते, राधाकृष्ण पाटील, नागराज पाटील, राघवेंद्र पाटील, अमोघ पुजारी, महेश अवताडे, परमेश्वर कुलकर्णी, प्रदिप पाटील, राहुल पाटील, श्रीकांत भरले, संजय ममदापुरे, सुभाष डोगे आदी उपस्थित होते.
जनसेवा हीच ईश्वर सेवा या संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.