सोलापूर प्रतिनिधी
सोलापुरात वारकरी संप्रदाय वाढवा तो टिकावा यासाठी अनेक जणांनी प्रयत्न केले..परंतु सोलापुरात माघवारी मध्ये ऐतिहासिक आणि क्रांतिकारी काम ज्यांनी केले ते म्हणजे श्रीगुरु सुधाकर महाराज इंगळे यांनी केले. कारण एखाद्या नवीन कार्याची निर्मिती करणं खूप अवघड असते. सोलापूर शहरातील आणि जिल्ह्यातील लोकांना आषाढी वारी मध्ये जावून रिंगण सोहळा पाहता येत नाही..याची उणीव भरून काढण्याचे काम आदरणीय ह.भ. प. श्रीगुरु सुधाकर महाराज इंगळे यांनी केले आहे.
सोलापुरात प्रथम रिंगण सोहळा आदरणीय ह.भ. प. श्रीगुरु श्रीगुरु Sudhakar Maharaj Ingale यांच्या संकल्पनेने 2012 साली सुरू केला..हा रिंगण सोहळा होम मैदान याठिकाणी झाला..दुसरा रिंगण सोहळा याच ठिकाणी झाला.. त्यानंतर पाच वर्ष पार्क मैदान या ठिकाणी हा रिंगण सोहळा झाला..असे सात वर्ष रिंगण सोलापुरात संपन्न झाले.. दोन वर्ष नार्थकोट मैदान या ठिकाणी हा रिंगण सोहळा झाला.. दोन वर्ष कोराना मध्ये गेले..हे सर्व पाहता हा येणारा रिंगण सोहळा 12 वा आहे..म्हणजे एक तप पूर्ण होतात.
म्हणून या वर्षीचा रिंगण सोहळा विशेष आहे. कारण तप पूर्ण करणार हा रिंगण सोहळा असल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण सोलापूर शहरात दिसत आहे.. तरी सोलापूर शहरातील तमाम वारकरी भाविकांना तसेच प्रत्यक नागरिकांना विनंती आहे..आपण या सोहळ्यासाठी उपस्थिती लावावी.
रिंगण म्हणजे काय ? रिंगण कशाचे असते ? रिंगण सोहळा वारीतच का केला जातो ? रिंगणात कोणी कोणी धावत ? या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर आज नार्थकोट मैदान या ठिकाणी ठीक ४ वाजता होणाऱ्या रिंगण सोहळ्यास आपण जरूर उपस्थिती लावावी ही नम्र विनंती...!
शब्दांकन - शिवानंद जाधव