वर्धा प्रतिनिधी
विभिन्न भाषा,वेश भुषा,रूढी,परंपरा, चालीरिती, अशा विविधतेने नटलेल्या या भारत देशाला एका सुत्रात बांधून ठेवण्याचे कार्य फक्त भारतीय संविधानामुळेच शक्य झाले आहे कारण संविधानाने सर्व भारतीयांना वैचारिक सुत्र दिले आहे असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा युवा विभागाचे सहकार्यवाह निखिल जवादे यांनी केले
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्यभर गेली २००७ पासून शहिद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या कल्पनेतून २६नोव्हेंबर संविधान दिन ते २६ जानेवारी गणराज्य दिना पर्यंत संविधान महोत्सव साजरा करण्यात येतो यानिमित्ताने वर्धा जिल्हा व शहर शाखेच्या वतीने म्युनिसिपल कमला नेहरू माध्यमिक विद्यालय येथे संविधान प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मंचावर महाराष्ट्र अंनिस चे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार मुख्याध्यापिका सौ महल्ले मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गजेंद्र सुरकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले भारत नावाचा हा देश विविध राजे महाराजे, संस्थानिक, जमिनदार,यांच्या अधिकार क्षेत्रात होता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व भारतीयांनी एक स्वप्न पाहले ते म्हणजे प्रत्येक भारतीयांचा सर्वांगीण विकास मात्र पंच्याहत्तर वर्षात शिक्षण,आरोग्य , बेरोजगार याबाबत सर्वांचे स्वप्न पुर्ण होवू शकले नाही कारण सत्तेवर येणा-्या लोकांचा हा विषय प्रधान्यांचा नाही त्यासाठी प्रत्येक भारतीयांनी संविधानातील हक्क व स्वातंत्र्य समजून घेतले पाहिजे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ.मुजबैलै मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन मानकर सर यांनी मानले कार्यक्रमास शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
विनित
गजेंद्र सुरकार