सांगोला प्रतिनिधी
काल परवा डिजीटल मीडीयावरती एक बातमी वाचायला मिळाली.. त्यामध्ये म्हणे.. शेकाप पक्ष महाविकास आघाडीतील घटक पक्षाला व विश्वासात घेत नाही तसेच शेतकरी कामगार पक्षात म्हणे वाद आहेत. शेतकरी कामगार पक्ष विरोधक म्हणून प्रश्न उपस्थित करीत नाही..वगैरे.वगैरे..असो.
माझा पहीला प्रती प्रश्न असा आहे, की महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस,शिवसेना ठाकरे गट व शेतकरी कामगार पक्ष,असताना ठाकरे गटाचे नेते व कार्यकर्ते सोडले तर राहीलेल्या पक्षाचे नेते कार्यकर्ते कुठे असतात. कुणाच्या मांडीला मांडी लावुन बसतात.हे तात्काळ स्पष्ट करावे.
देशात व संपुर्ण राज्यात भाजप व शिंदे गटांशी वैचारिक सामना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी पहावयास मिळत आहे.मग आमच्या सांगोल्यात मात्र आंदरसे हम सब एक..असं का ...मग हा ज्या त्या पक्षाशी व त्यांच्या नेतृत्वाशी फसगत करण्याचा प्रकार नाही का ?
शेतकरी कामगार पक्षाची परंपरा विश्वासघाताची नाहीच नाहीच.
आणी हो शेकाप पक्षातील वादाबाबत बोलुन , चर्चा करुन त्याचा चुकीचा प्रचार करुन तुमचे पक्ष वाढणार नाहीत तुमचे जनमत वाढणार नाही.शेकाप पक्षात कुठलाही वाद नाही समजा एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या पदासाठी इच्छुक होणे व पद मागणे शेकाप पक्षात तरी गैर नाही आमचे कार्यकर्ते उमेदवारी पदे मागतात.ती मागत असताना मर्यादेपर्यंत मागत असतात वाद निर्माण होऊ देत नाहीत मिळाले ते ठिक नाही मिळाले तरी ही लगेचच लागले पक्षाच्या कामाला.हेच दुखण आहे. काही लोकांचे कारण पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. भाई बाबासाहेब देशमुख हे दिवसातील पंधरा सोळा तास जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत. शेकाप पक्षाचे चिटणीस,चेअरमन,आजी माजी सभापती पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक सरपंच हे लोकांची कामे करीत आहेत. जनसंपर्क ठेऊन आहेत लोक त्यांना प्रतिसाद देत आहेत हीच काहींची अडचण झाली आहे.
अहो भले भले पक्ष बदलतात ,भुमीका बदलतात पण शेकाप पक्षाचा ग्राउंड लेव्हलला काम करणारा कार्यकर्ता सुध्दा शेकाप पक्ष सोडत नाही कारण स्व. आबासाहेबांचा आदर्श व वैचारिक अधिष्ठान आहे म्हणून
आता उरला विषय सामान्यांच्या प्रश्नांचा तर शेतकऱ्यांच्या शेतातील तोडलेली विज जोडणीबाबत पहीला आवाज शेकापक्षाने उठवला,उध्वस्त झालेल्या डाळींब बागांना अर्थीक मदत मिळावी म्हणून शेकाप पक्षाने आवाज उठवला.कोरोना काळातील विद्यार्थ्याची फी कमी करण्यासाठी शेकाप पक्षाने आवाज उठवला..गावोगावातील पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहरीवरील विज जोडणी ताबडतोब करण्यासाठी शेकाप पक्षाने आवाज उठवला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करुन मदत मिळावी म्हणून शेकाप पक्षाने आवाज उठवला...पिक विमा मिळावा म्हणून शेकाप पक्षाने आवाज उठवला...आरक्षणाबाबत शेकाप पक्षाने आवाज उठवला... राष्ट्रपुरुषांच्या बाबत अवमानकारक वक्तव्याचा शेकाप पक्षाने निषेध केला...राजकारणातील खालच्या थराला जाऊन होत असलेली टिका टिपण्णी याबाबत शेकाप पक्षाने नाराजी व्यक्त करुन राजकारणाचा स्तर उंचावण्यासाठी अहवान केले.हे आपणास कसे माहीत नाही...असो..
राहीला विषय 2024 च्या निवडणुकीचा आजही जनतेचा शेकाप पक्षावरतीच विश्वास आहे म्हणुन तरी 2019 नंतरच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप पक्षाने वर्चस्व राखले आहे.. संस्थेच्या निवडणुकीत प्राबल्य राखले आहे...व येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये सुज्ञ जनता शेतकरी कामगार पक्षावरच विश्वास टाकणार आहे हे येणाऱ्या काळात समोर येईलच असे मत शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी व्यक्त केले आहे.