कारखान्याने खोटी माहिती देऊन साखर आयुक्तांकडून गाळप परवाना मिळवला
सोलापूर प्रतिनिधी
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाची कोणतीही परवानगी नसताना आज राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन दिनासच चक्क तीन पट अवैध गाळप करून प्रदूषणाच्या कायद्यांच्यी खिल्ली उडवली आहे. सिद्धेश्वर कारखान्याने 2014 स बांधलेल्या को जनरेशन चिमणी व विस्तारीकरण प्रकल्पास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजपर्यंत कोणतीच मान्यता दिलेली नाही व देणार ही नाही असे ठाम सांगितलेले असताना देखील , तसेच 1 नोव्हेंबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिद्धेश्वर साखर कारखान्याने कोणत्याही परिस्थितीत प्रदूषण नियंत्रण मंडळाची नियमांची पूर्तता केल्याशिवाय गाळप करू नये अशी सक्त ताकीद देऊन, त्यावर दोनदा नोटीस बजावून सुद्धा साखर कारखाना निर्लज्जपणे गाळप करत आहे. त्याबाबत तक्रार करते व सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रिजनल ऑफिसर श्री वाघमारे ,पुणे व चेअरमन, मुंबई यांना तातडीने ई-मेल धाडून 72 तासात प्रदूषण करणारा व विना परवाना चालू असलेला सिद्धेश्वर साखर कारखाना बंद करण्याचे अल्टिमेटम दिले आहे.
तसेच कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज धर्मराज कडादी व संचालक रवींद्र पाटील यांनी खोट्या कागतपत्रद्वरे साखर आयुक्तांकडून गाळप परवाना मिळविला आहे. सोलापूरच्या साखर सहसंचालकांनी गाळप परवाना अर्जात रावसाहेब शिवराम खडके व इतर 12 जणांच्या एफआरपीची पूर्ण रक्कम न मिळाल्याची व इतर 5 त्रुटी असल्याचे सांगून सुद्धा साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे गाळप परवाना दिल्याचे डॉ.आडके यांनी माहीत अधिकारात बाहेर काढले आहे. त्यामुळे आता छातीठोकपणे कारखान्याची बाजू मांडणारे धर्मराज कडादी आणि साखर आयुक्त चांगल्याच अडचणीत आले आहेत.
बेकायदा चिमणी पाडल्याने सिद्धेश्वर साखर कारखाना बंद होणार आहे व त्यामागे कारखाना बंद करण्याचे कुटील कारस्थान आहे अशी कोल्हेकुई आता तरी बंद होऊन कामगार व सभासद शेतकरी भानावर येतील अशी आशा विचार मंचद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.