सांगोला प्रतिनिधी
स्व आबासाहेबांच्या दुःखद निधनानंतर स्व आबासाहेबांचे मोठे नातु डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी संपुर्ण मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य कार्यकारिणीने आ.भाई जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी युवक संघटनेची राज्याची जबाबदारी टाकली व डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असताना दिसत आहेत.
शेतकरी कामगार पक्षांच्या 75 व्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त अलीबाग येथील म आमेळाव्यात डॉ बाबासाहेबांनी पक्षीय भुमीका व पक्षाची परंपरा यावरती आपली भुमिका स्पष्ट करताना जे विचार मांडले त्यामुळे त्यांच्या नावाची दखल राज्य भर घेतली जात आहे..
तसेच काल परवा गडचिरोली येथे शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समीतीच्या बैठकीत डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवला त्याची सुध्दा चर्चा राज्यभर झाली आहे.तसेच मतदार संघातील प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी होताना दिसत आहेत.. शेतकऱ्यांच्या अडिअडचणी सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्न करताना दिसत आहेत.कुठलाही सामाजिक, सांस्कृतिक अथवा वयक्तिक कार्यक्रम असो डॉ साहेब उपस्थित राहुन सुख दुःखात सामील होताना दिसत आहेत.
त्यांच्या कामाच्या या पध्दतीने तरुण वर्ग त्यांना आदर्षवृत्त समजत आहेत.तरुणांना डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे आयडाॕल समजतात.
स्व आबासाहेबांच्या कामाची , वागण्याची बोलण्याची पध्दत डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्यात जनता पहात आहेत.. म्हणुन तरी ते तरुणांचे आयडाॕल निर्माण झाले आहेत.