"भारत जोडो" यात्रा देशाच्या ऐक्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, बेरोजगार युवक युवतीसाठी, शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, उद्योगाच्या हितासाठी, आणि महागाई विरोधात आहे. :- माजी आमदार प्रकाश यलगुलवार
अकोला प्रतिनिधी
अकोला येथील "भारत जोडो" पदयात्रेत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुलजी गांधी, प्रदेश कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे, प्रदेश आणि राष्ट्रीय नेतेमंडळी यांच्यासोबत "भारत जोडो" यात्रेमध्ये सोलापुरचे माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी सहभाग घेतला. तसेच टी टाईम मध्ये खा. राहुलजी गांधी यांच्यासोबत चहा आणि अल्पोपहार घेतला. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सोलापुर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, शहर अध्यक्ष प्रकाश वाले उपस्थित होते.
यावेळी "भारत जोडो" पदयात्रेत माजी आमदार विश्वनाथ चाकोते, सोलापुर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, माजी महापौर अलकाताई राठोड, आझम सैफन, मनोज यलगुलवार, तिरुपती परकीपंडला, धनेश अचलारे, राहुल वर्धा, राहुल गोयल, प्रवीण जाधव, विवेक कन्ना, राजेन्द्र शिरकुल, सुनील सारंगी आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी माहिती दिली की, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. राहुलजी तळपत्या उन्हात, बरसणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर झेलत यात्रा चालली आहे. सत्याग्रहाच्या मार्गाने चाललेली ही पदयात्रा नव्या संघर्षची नांदी आहे. हा संघर्ष देशाच्या ऐक्यासाठी आहे, देशातील सर्वसामान्य जनतेसाठी आहे, बेरोजगार युवक युवती साठी आहे, शेतकरी शेतमजूर, कामगारांसाठी आहे, आपले भविष्य घड़वीणाऱ्या विद्यार्थ्यांसाथी आहे, रोजगार देणाऱ्या उदयोगासाठी आहे, देशभरातील निष्ठावान कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत एकवटले आहेत देशात एकप्रकारचे व्यापक आंदोलन करण्याचे नैतिक बळ आजही काँग्रेसमध्ये आहे.
स्वातंत्र्यलढ्याचा महान वारसा या पक्षाला लाभला आहे. स्वातंत्र्यानंतर मागील सात दशकात देश उभारण्यासाठी दिलेले योगदान काँग्रेसच्या बाजूने आहे. विशेष म्हणजे देशाच्या सर्व दूर कानाकोपऱ्यात काँग्रेस विचारांची पाळेमुळे रुजलेली आहेत. या सगळ्या ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या पाठबळावर आणि आपल्या नैतिक सामर्थ्यावर राहुल गांधी देशातील जनतेची दुबंगलेली मने जोडण्यासाठी व जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांचा आवाज बुलंद करण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या पथावर मार्गकरण करीत आहेत.
जगातील सर्वात मोठ्या या ऐतिहासिक "भारत जोडो" पदयात्रेत राहुलजी गांधी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, यांच्यासोबत सहभागी झालो याचा आनंद वाटत आहे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत जनतेसाठी काँग्रेससाठी संघर्ष करण्याचा प्रयत्न राहिल. अशी माहिती प्रकाश यलगुलवार यांनी दिली.