विटा प्रतिनिधी
माझ्या राजकीय जडणघडणीत तात्या हे मोठे योगदान देणारे निस्वार्थी नेते होते. नेते तयार करणारे राजकारणी आता कमी राहिले आहेत. म्हणजे स्वर्गीय हनमंतराव तात्या साळुंखे हे होते. कलेढोण तालुका खटाव जिल्हा सातारा येथील हनमंतराव यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त बोलत होते. त्यांना सामाजिक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई, परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, मायणी चे सरपंच सचिन गुदगे, संजीव साळुंखे, यांच्यासह खटाव तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी बोलताना सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई म्हणाले, खानापूर आटपाडी विधानसभेचे आमदार अनिल भाऊ बाबर यांना सामाजिक पुरस्कार देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वात जनतेत मिसळून काम करणारा सामान्य आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. आजही त्यांचे मार्गदर्शन आम्हाला कायम प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्र्यांच्या जवळचे नेतृत्व असून सुद्धा चेहऱ्यावर सोडून द्या परंतु वागण्यास सुद्धा कोणताही बदल त्यांनी होऊन दिला नाही. हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीचे यश आहे.
यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप येळगावकर म्हणाले, कैलासवासी हनमंतराव तात्या साळुंखे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा माजी पुरस्कार खानापूर आटपाडी चे विद्यमान आमदार व आमच्या सर्वांचे नेते अनिल भाऊ बाबर यांना देताना खूप आनंद झाला. सर्वसामान्यांचे नेतृत्व कसे असावे याचे धडे आजही आम्ही त्यांच्याकडून घेत आहोत.
माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, स्वर्गीय हनमंतराव साळुंखे यांनी नेते घडवले. की एक म्हणजे अनिल भाऊ आहेत. त्यांच्या सामाजिक कामावर टाकली की आम्हाला तात्यांची आठवण होते.
यावेळी बोलताना आमदार अनिल भाऊ बाबर म्हणाले, हनमंतराव तात्या आणि माझी ऋणानुबंध हे वेगळ्या प्रकारचे होते. माझ्या पहिल्या जिल्हा परिषद निवडणुकी वेळी तात्यांनी मला मदत केली होती. मी ज्यावेळी राजकारणात नवीन होतो त्यावेळी तात्या हे माझ्या व्याख्यानमालेचे प्रमुख वक्ते म्हणून होते. त्यांचा ऋणानुबंध कायम जपला होता. मी आजही जपत आहे. माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार असून अशा व्यक्तीच्या नावे पुरस्कार मिळाल्यानंतर माझा आनंद वेगळाच आहे. पुरस्कार या नादाला कधी लागत नाही परंतु पुरस्कार घेताना मला अतिव आनंद झाला. माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे वाटले. यावेळी अनिल भाऊ बाबर यांनी कधी राजकीय स्थिती व सर्व राजकीय व्यासपीठावर बोलत असताना हास्याचे फवारे उमटवले.यावेळी संजीव साळुंखे यांनी प्रास्ताविक करताना हनमंतराव साळुंखे यांच्या कार्याचा आढावा दिला.