आवक वाढली दर घसरला ?
ईगतपुरी तालुका प्रतिनिधि - नवनाथ गायकर
- ईगतपुरी व त्रंबकेश्वर हे दोन्ही आदिवासी बहुल तालुके भात, नागली, वरई आदि खरिप पिकांसाठी प्रसिद्द आहे. यंदा परतीच्या पावसामुळे भात सोंगणीचा हंगाम लांबला असुन सध्या सर्वत्रच भात सोंगणीच्या कामाने वेग पकडला असुन, नव्याने उत्पादित भात बाजारपेठेत यायला प्रारंभ झाला आहे. दुसरीकडे मात्र भातासह खरिप पिकांची आवक वाढताच अनियंत्रीत व्यापारी वर्गाने संघटितपणे भातासह खरिप पिकाचे दर कमालीचे घटवले आहे. दरम्यान यामुळे शेतकरी वर्ग मात्र प्रचंड संतापला असुन सोशल मिडीयावर व्यापारी, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या विरुद्ध तक्रारी व संतापाचा पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
यंदा परतीच्या पावसामुळे खरिप सोंगणीचा हंगाम लांबणीवर पडला होता. सध्या या कामाने वेग घेतला असुन नव्याने तयार विक्रीयोग्य भात व खरिप पिके बाजारपेठेत दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे.
ईगतपुरी तालुकाच नव्हे तर आजुबाजुची तब्बल तीन जिल्हे व सहा सात तालुक्यातील भात मोठ्या प्रमाणात घोटी या शहरात विक्रीसाठी येतो आहे.
मात्र भाताची आवक वाढताच व्यापारी वर्गाने मात्र संघटित पणे भाताचे दर घटवले असुन शेतकर्याचीं मोठ्या प्रमाणात अडवणुक सुरु केली आहे.
हा भात उत्पादक भाग मोठ्या प्रमाणात आदिवासी बहुल असुन आदिवासी शेतकर्याचीं पद्धतशीर पणे लुट सुरु असल्याचे दिसुन येत आहे.
योग्य दराची मागणी केल्यास सातच घेणे नाकारले जाते. यामुळे आर्थिक विवंचनेत असणारा शेतकरी मातीमोल दराने मिळेल तो भाव घेऊन भात विक्री नाईलाजाने करतो आहे. कारण गुंतवलेले भांडवल मोकळे करणे, नव्या लागवडीसाठी भांडवल व घरगुती अडचणी आदि समस्यांमुळे त्रस्त शेतकरी तातडीने माल विक्रीचि पर्याय स्वीकारतो आहे.
दरम्यान घोटी मार्केट कमेटीवर सध्या प्रशासन राज असल्याने सगळा आनंदी आनंद सुरु आहे. व्यापार्यांवर नियंत्रण ठेवण्याचे काम मार्केट कमेटी चे आहे. प्रत्यक्षात मार्केट कमेटी प्रशासनाचे या संघटित लुटीकडे कुठेही लक्ष दिसत नाही. हमी भाव घोषित होऊनही त्या प्रमाणे खरेदी होत नसल्याचे वास्तव चित्र आहे.
एकाधिकार खरेदी योजना गुंडाळलेल्या गेल्या आहेत.त्याचा फायदा व्यापारी उठवत आहे.
आदिवासी महामंडळे तर केवळ शोभेचे बनले असुन ते नेमके करतात तरी काय असा सवाल केला जातो आहे.
शेतकर्याचीं लुट थांबवा- डॉ. खातळे
घोटी शहरात घोटी मार्केट कमेटी च्या नाकावर टिच्चुन शेतकर्याचीं लुट सुरु आहे. प्रशासन ढाराढुर झोपलेले आहे तर केवळ राजकारणाचा अड्डा बनवणारे लोकप्रतिनिधी आज शेतकरी प्रश्नावर कुठेही दिसत नाही.
- डॉ. दिलीप तथा बाळासाहेब खातळे
जेष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
व्यापार्यानां आवरा- मदन कडु
घोटी शहरातील व्यापारी वर्गावर प्रशासनाचे कुठेही नियंत्रण दिसत नाही. यामुळे व्यापारी पद्धतशीरपणे व संघटितपणे शेतकरी वर्गाची लुट करत आहे.
त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे नेमके काय करत आहेत ?
- मदन कडु
युवा नेते तथा सामाजीक कार्यकर्ते