मुंबई प्रतिनिधी - शांताराम गुडेकर
जॉय सामाजिक संस्था मुंबई यांना नुकताच राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार २०२२ बदलापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी सांगितले की समाजात अनेक प्रकारे चांगले कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा आम्ही आमच्या द्वितीय वर्धापन दिनानमित्त पुरस्कार देऊन सन्मान करीत आहोत ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
जॉय संस्था मागील अनेक वर्षांपासून राज्यात सातत्याने समाजातील गोर-गरीब, वंचित,आदिवासी,दीन दुबळे,रोजंदारी कामगार आदी घटकांसाठी कार्य करीत असून प्रामुख्याने त्यांचा फोकस हा विद्यार्थ्यांवर राहिला आहे. आजही त्यांच काम जोमाने सुरू आहे.आमच्या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन आम्हाला हा मानाचा पुरस्कार मिळत असल्याने आमची जबाबदारी आणखी वाढली असून पुरस्कार हे अधिक जोमाने काम करण्यासाठी नवीन ऊर्जा देत असतात.
आम्ही यापुढेही नक्कीच समाजासाठी कार्य करीत राहू असे जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी पुरस्कार स्वीकारल्या नंतर संगितले.चंद्रशेखर सावंत, भूषण मुळे, योगिता हिरवे, असूंता डिसोझा, मीना भुतकर, प्रियांस हिरवे आदी जॉय चे सभासद पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज वेळातवेळ काढून उपास्थित होते.यावेळी जॉय संस्थेला सहकार्य करणाऱ्या देणगीदार व हितचींतकांचे हिरवे सरांनी आभार मानले व पुरस्कार जरी संस्थेला मिळाला असला तरी तो संस्थेचे हितचिंतक, देणगीदार, सभासद यांचा असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला दिलीप नारकर, प्रेरणा गावकर, राजेश कदम आदी मान्यवर पाहुणे आणि जनजागृती चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुग्रास भोजनाचे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.