पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरालगत असलेल्या तीन ते साडे किलोमीटर अंतरावरच्या लक्ष्मी टाकळी ही सर्वात मोठी ग्रामपंचायत समजली जाते याचबरोबर शहरापासून अवघ्या जवळच असल्याने त्याचे विस्तारीकरण होऊन झपाट्याने उपनगर मध्ये वाढ होऊ लागले असल्याने लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत नागरिकांना नागरी सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत असल्याने या ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करावे अशा आशयाचा ठराव लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सदस्याने करून गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना लेखी निवेदनाद्वारे काही दिवसापूर्वी जिल्हा असून याबाबतचे सविस्तर पत्र निवेदन बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख महेश साठे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले असून मुख्यमंत्र्यांनी या पत्राची निवड निवेदनाची दखल घेऊन तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ची स्थापना ही एक मे 1965 ला झाली असून आताही ग्रामपंचायत जवळजवळ 40 ते 42 वर्षाची होत असून या लक्ष्मण टाकळी गावचा विस्तार वाढू लागला आहे याकरता ही ग्रामपंचायत नगरपंचायत होणे गरजेचे आह2011 चे जनगणनेनुसार लक्ष्मी टाकळीची लोकसंख्या 10122 असून सध्या या लक्ष्मी टाकळी व परिसर मिळून सुमारे 20 ते 25 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे तसेच वरचेवर गावठाण भाग सोडून प्लॉट एरिया मध्ये नागरी वसाहती वाढत आहेत.
त्यामुळे या सर्वांना सुविधा पुरविण्यात ग्रामपंचायतला आर्थिक सह इतर बाबीची कसरत करावी लागत आहे या सर्व बाबींचा विचार करून महेश साठे व त्यांचे सहकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी ठराव करून लक्ष्मी टाकळीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करावे अशी मागणी केली आहे.
हीच मागणी लेखी पत्राद्वारे दोन दिवसापूर्वी महेश साठे यांनी मुख्यमंत्री यांना भेटून केली आहे या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांना तात्काळ धडकल घेण्यास सूचित केले आहे त्यामुळे आता लवकरच पंढरपूर शहराजवळ असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होणारा आहे.
सध्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत भाजपा व शिंदे सेना अर्थात परिचारक गटाची असून राज्यात भाजपा व शिंदे यांचे सरकार असल्याने ही ग्रामपंचायत नगरपंचायत होण्यास वेळ लागणार नाही ही झाल्यानंतर नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची तेवढीच जबाबदारी या सदस्यावर राहणार आहे मुख्यमंत्री आणि साठे यांनी दिलेल्या निवेदनाचे दखल घेतल्याने लक्ष्मी टाकळी वासियांच्या व उपनगरातील लोकांच्या आशा पल्लवीत झाले आहेत