शेळवे प्रतिनिधी
सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे आज संविधान दिनाच्या निमित्ताने बाल सभेचे आयोजन करण्यात आले, सुरुवातीला राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुंबई येथील ताज हॉटेल वर झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात वीरमरण प्राप्त झालेल्या सर्व शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
बाल दिनाच्या निमित्ताने अनेक बालगोपालांनी आपल्यात दडलेल्या सुप्त कलागुणांना वाट मोकळी करून दिली,त्यामध्ये कु.सिद्धी उमेश पोरे हिने पखवाजाच्या तालावर जिंदगी एक सफर हैं सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना... हे गीत अतिशय सुरेखपणे सादर केले, कु. उत्कर्ष उमेश पोरे याने तिला तबला वादनाची सुरेख साथ दिली.
सदर बालसभेचे पूर्ण नियोजन इयत्ता सहावीच्या विध्यार्थ्यांनी केले, कु.ओम नामदेव चव्हाण यांनी बालसभेचे अध्यक्ष पद भूषवले तर कु.संचीता बाबासो पवार व अक्षरा धुमाळ हिने सूत्रसंचालन केले.अनुष्का अविनाश पाटील,सई प्रकाश गाजरे यांनी सुरेख नाट्य छटा सादर केली,कु.ओम अनंता श्रीखंडे व समर्थ सत्यवान सदगर यांनी मनोगत व्यक्त केले तर कु.पृथ्वीराज मारुती साळुंखे,सोहम अनिल शिंदे व सोहम रवींद्र जगदाळे यांनी आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने परफेक्ट कॉम्प्युटर चे दादासाहेब पवार हे प्रमुख पाव्हने म्हणून उपस्थित होते त्यांनी आपल्या मनोगतातून विध्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पर्धा परीक्षेचे महत्व पटवून सांगितले, प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष समाधान गाजरे यांनी आपल्या मनोगतातून २६/११ या तारखेचे महत्व सांगितले, तसेच संस्थेचे संस्थापक सचिव अंकुश गाजरे व संस्थापक उपाध्यक्ष अजित लोकरे यांनी बालसभेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले; तसेच आजच प्रशालेच्या अष्ट प्रधान मंडळाची निवड करण्यात आली.
त्यामध्ये कला-क्रीडा, सांस्कृतिक, स्वच्छता, परिपाठ, सहलप्रमुख, स्पर्धा परीक्षा,प्रसिद्धी विभाग प्रमुख इत्यादी साठी विध्यार्थ्यांची निवड करण्यात आली, त्यामध्ये जनरल सेक्रेटरी ( GS) म्हणून उत्कर्ष उमेश पोरे व विध्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून कु. प्रत ईयत्ता सहावीतील विध्यार्थ्यांच्या वतीने सर्व गुरुजनांचा सन्मान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.