मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव सामाजिक न्याय विभाग तुकाराम साळुंखे पाटील यांच्याकडून जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचे प्रलंबित मागणी बाबत निवेदन विधिमंडळाचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांना शिष्ट मंडळ घेऊन निवेदन देण्यात आले.
या निवेदनात समाजाच्या एकूण 13 मागण्या असून शासनाने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून समाज घोषित करावा समाजासाठी सांस्कृतिक मंडळ स्थापन करावे समाजासाठी आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे समाजातील मुला मुलींना शासकीय सेवेत सामावून घेणे समाजातील गरजू मुला मुलींना धंद्या उद्योगासाठी आर्थिक सहाय्य मिळावे समाजासाठी देवस्थान असलेल्या जमिनी ज्या त्या देवस्थान सेवक पुजारी सालकरी यांना देण्यात याव्यात.
समाजासाठी आर्थिक दुर्बल असलेल्या लोकांना घरकुल देण्यात यावीत तसेच समाजासाठी बसण्या उठण्यासाठी व सांस्कृतिक मंडळ स्थापन करण्यासाठी सभामंडप किंवा समाज मंदिर बांधून मिळावे आणि समाजासाठी समाजाचा प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर आणि लोकसभेवर आणि शासकीय मंडळावर प्रतिनिधित्व देण्यात येईल इत्यादी मागण्या जय हिंद महाराष्ट्र राज्य घडशी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तुकाराम साळुंखे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे संघटक सचिव यांच्याकडून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समाज कल्याण मंत्री महसूल मंत्री व स्थानिक आमदार खासदार जिल्हाधिकारी आयुक्त विभागीय आयुक्त यांना समक्ष भेटून व ऑनलाइन निवेदन सादर करून समाजासाठी मागणी केली आहे.
समाजाची विनंती की पूर्वीच्या शासनाने राज्यकर्त्यांनी या घडशी समाजाकडे दुर्लक्ष केले होते आता तरी शासनाने राज्यकर्त्याने या गोरगरीब समाजाकडे शासनाने उपेक्षित असलेल्या अपेक्षित समाजाचे काय प्रश्न आहेत काय मागणी आहेत.
याकडे लक्ष देऊन येणाऱ्या विधिमंडळात प्रश्न उपस्थित करून समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा घडशी समाज करत आहे