१२ ऑक्टोबर हा "जागतिक संधिवात" दिवस म्हणून संधिवाताबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून त्याचे लवकर निदान व योग्य उपचार करण्याच्या हेतूने दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षी याचे ब्रीदवाक्य आहे "ईट्स इन् युर ह्यानड्स , टेक अँक्शन" अर्थात हे तुमच्याच हातात आहे लवकर इलाज करा व आजच डॉक्टरांशी संपर्क साधा.
संधिवात हा अमेरिकेप्रमाणे भारतात सुद्धा नंबर १ चा अपंगत्व निर्माण करणारा आजार आहे.
४ जणांमध्ये मागे १ रुग्ण संधिवाताने ग्रस्त.
१८ ते ७० वयोगटात जास्त प्रमाण.
*लक्षणे:* सुरुवातीला एखादा सांधा किंवा गुडघे दुखू लागणे, सूज येणे, गरम व लाल होणे, जिने चढ-उतर करताना गुडघे किंवा सांधे दुखणे, खाली मांडी घालून बसायला त्रास होणे ही लक्षणे जाणवतात. त्यानंतर सांध्यामधून आवाज येणे, सांध्याच्या हालचाली कमी होणे किंवा सांधा आखडणे, गुडघ्याला किंवा संध्याला बाक येणे व आजार बळावल्यानंतर माणसांना आपल्या नित्याच्या गोष्टी करण्यास त्रास होतो व चार पावले चालणे अवघड होऊन बसते, त्यामुळे बऱ्याचशा व्यक्तींना असहाय्यतेचा सामना करावा लागतो.
*प्रकार :* आस्टिओअर्थराईटीस म्हणजेच वयोमानानुसार हाडातील कॅल्शियम कमी होऊन हाडे ठिसूळ होऊन संधिवात होणे सर्वसाधारणतः गुडघ्यांवर याचा परिणाम होतो. ह्या संधिवाताचे प्रमाण खूप वाढत आहे.
रूम्याटाईड अर्थराइटिस हा एक ऑटो इम्युन आजार आहे. लहान मुलांच्यात सुद्धा जाणवतो. अनुवंशिकतेमुळे होतो. हा प्रकार पूर्ण बरा होऊ शकत नाही पण औषध गोळ्याने नक्कीच कमी करू शकतो.
गाऊटी अर्थराइटिस रक्तातील युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्यामुळे होतो. द्विदल धान्य, बेसन व डाळीचे पीठ, दारू वर्ज करणे व योग्य व नियमित औषध उपचार आहे पूर्ण बरा होऊ शकतो.
सोरीआटिक अर्थराइटिस सोरियासिस या चर्मरोगाच्या रुग्णांमध्ये एखादा सांध्यामध्ये जाणवतो.
पोस्ट ट्राम्याटिक ,पोस्ट इन्फफेक्टिव अर्थरायटीस काहीवेळा सांध्यांमध्ये जंतुसंसर्ग किंवा मार लागल्यामुळे सुद्धा संधिवात उद्भवतो.
*उपचार:* नजीकच्या अस्थिरोगतज्ञाकडे जाऊन आपल्या लक्षणानुसार योग्य त्या रक्ताच्या चाचण्या ,एक्स-रे , एम आरआय करून कोणत्या प्रकारचा संधिवात आहे हे निदान करून; सुरुवातीला वजन कमी करणे ,आहार नियंत्रण, भौतिक उपचार, सांध्यांना शेकणे, वेदनाशामक, नि क्याप किँवा सपोर्ट वगैरे वापरून तसेच आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवून एक ५०० मीली ची कॅल्शियमची गोळी दररोज घ्यावी. नियमितपणे डॉक्टरांचा सल्ला घेणे व नियमित भौतिक उपचार चालू ठेवणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे.असे न केल्यास लक्षणे बळावत जातात व पुढे एखादी शस्त्रक्रिया करण्यापर्यंत परिस्थिती उद्भवू शकते. गुडघ्यांना जेव्हा खूप बाक येतो व औषधोपचार कामी येत नाहीत त्यावेळी रशियन "एलिझारोव्ह" या दोनच टाक्याच्या गुडघा न बदलता शस्त्रक्रियेने अतिशय चांगले परिणाम येतात. रुग्णाला अपल्या नैसर्गिक गुडघ्याची मांडी घालून खाली बसता येते व पुढे पंधरा ते वीस वर्ष आपला सांधा अतिशय व्यवस्थित प्रमाणे वापरू शकतो. इलिझारोव्ह ही शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावी व जास्त खर्चिक नाही. साधारणतः एका गुडघ्यास 80 हजार पर्यंत खर्च येतो. अर्थरोस्कोपी ने सांधे साफ करून तात्पुरता आराम मिळू शकतो. जर सांधे खूपच खराब झाले तर त्या वेळेला जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करून कृत्रिम सांधेरोपण केले जाते.ही शस्त्रक्रिया फार मोठी व खर्चिक आहे.परत पुढे १२ ते १५ वर्षात हा कृत्रिम सांधा बदलावाच लागतो.
अर्थरायटीस व अस्थीरुग्णांचे लवकर आणि योग्य उपचार झाल्यास कोणत्याही वयापर्यंत रुग्ण आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतात.
डॉ. संदीप आडके.
अस्थीरोग व रशियन इलिझारोव्हतज्ञ .
आडके हॉस्पिटल ,सोलापूर.९८२२८०७००७.
snd007@hotmail.com
www.ilizarovadke.com