सोलापूर प्रतिनिधी
यावर्षी – परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने सोलापुरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. म्हणून सोलापूर जिल्हात ओला दुष्काळ जाहिर करा. अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात यंदा संपुर्ण महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकरी बळीराजाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. म्हणून सोलापूरातील सर्व शेतींचे नुकसान झालेले पंचनामे ताबडतोब हाती घेण्यात येऊन शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी व आधार देण्यासाठी सरसकट प्रति एकरी 50 हजार रुपये मदत जाहिर करावे. अशी मागणी सोलापूर शिवसेनेच्या वतीने करण्यात येत आहे.
तरी सोलापूरच्या जिल्ह्याधिकारी या नात्याने वरील विषयी गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत अंमलबजावणी करावी. अन्यथा सोलापूर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. असे नमुद करण्यात आले आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे साहेब म्हणाले की, यंदाच्यावर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. परंतु महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार शेतकऱ्यांना मदत करतांना भेदभाव करीत असल्याचे दिसून येते. कारण मराठ वाड्यातील शेतकऱ्यांना मदत दिला जातो. पण सोलापूर शेतकऱ्यांना मदत न दिल्याचे स्पष्ट दिसून येते हे आम्ही सहन करणार नाही. असे म्हणाले.
पुरुषोत्तम बरडे व विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली ओला दुष्काळ जाहिर करा या मागणीसाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भिमाशंकर म्हैत्रे, संतोष पाटील, दत्तोपंत वानकर, समन्वयक अतुल भंवर, भैय्या धाराशिवकर, विजय पुकाळे, उपशहरप्रमुख रेवण पुराणिक, रेवण बुक्कानुरे, सचिन गंधुरे, अमित भोसले, अनिल कोंडुर, धनराज जाधव, बालाजी विटकर, दिपक गवळी, आलाश कोळी, अजय खांडेकर, संदिप म्हैत्रे, अभिषेक चिलका, गुरूनाथ कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.