करमाळा प्रतिनिधी
आज मौजे कंदर ता.करमाळा येथे अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राची मा.आ.नारायणआबा पाटील यांचेसह पाहाणी केली.या परिसरातील सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावरील केळी,ऊस,कांदा मका ही पीके अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत.संबधित अधिकार्यांशी चर्चा करुन पंचनामे उद्यापासुनच करुन पंचनामे करताना सर्व बाधित शेतकर्यांना न्याय मिळाला पाहीजे अशा सुचना विधान परिषदेचे आमदार रान जित सिंह मोहिते पाटील यांनी केल्या आहेत.
यावेळी मा.जि.प सभापती शिवानाना कांबळे,अदिनाथचे मा.व्हा.चेअरमन नानासाहेब लोकरे,मा.संचालक शिंदे भाऊसाहेब,भारतनाना पाटील,बंडु माने,अमरजित साळुंखे,दादासाहेब पवार,औदुंबर लोकरे,अनिल यादव,पिंटु भगत विजय नवले,अजित वगरे,सुभाष पवार,संतोष माने,अतिवृष्टी बाधित शेतकरी,सर्कल अधिकारी,तलाठी उपस्थित होते.