बीड प्रतिनिधी
गेल्या वर्षभरातील हा तिसरा कारखाना आपण सुरू करत आहोत. पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना, सांगोला येथील साखर कारखाना आणि आता बीड येथील गजानन सहकारी साखर कारखाना सुरू होत आहे. केवळ कारखाने सुरू होत नसून त्यासोबतच हजारो शेतकरी बांधवांच्या नव्या आशा देखील पल्लवित होत आहेत.
सदर कारखाना २०१३ पासून बंद असून आता पुन्हा नव्या जोमाने सुरू होत आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यातील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. हजारो शेतकरी बांधव या गाळप हंगामाने सुखावले जाणार आहे.
यावर्षी होणार गाळप हंगाम अनेक पद्धतीने विशेष ठरणार आहे. त्याचे सुयोग्य नियोजन करून प्रत्येक शेतकरी बांधवाच्या ऊसाच्या शेवटच्या कांडीचे गाळप करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे.