पुणे - सुभाष मुळे
जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक गणेश हिरवे यांचा नुकताच पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भारताच्या अमृत महोत्सवा निमित्त विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.हिरवे सरांचे काम खूप मोठे असून लॉक डाऊन काळातही त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पाच वेळा रक्तदान करून आतापर्यंत एकूण ३५ वेळा रक्तदान केलेलं आहे. लॉकडाऊन मध्ये वंचित गरीब रोजंदारीवर काम करणाऱ्या हजारो कुटुंबांना त्यांनी वैयक्तिकपणे व त्यांनी स्थापन केलेल्या जॉय संस्थेच्या माध्यमातून सहकार्य केले होते व आजही विविध आश्रमशाळा, वंचित विद्यार्थी, वृध्दाश्रम अनेक गरजूंना ते सहकार्य करीतच असतात.आतापर्यंत हिरवे सरांच्या कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना एकूण ११६ पुरस्कार व ७७ करोना योद्धा सन्मानपत्र मिळालेली आहेत.पुस्तक भेट देणं हा सरांचा विशेष छंद असून आतापर्यंत सरांनी जवळपास तेरा हजारांहून अधिक पुस्तकं विविध शाळा, ग्रंथालये, क्रीडा स्पर्धा, सण-समारंभ आणि नागरिकांना भेट दिलेली आहेत.त्यांच्या या छंदाचे सर्वच स्तरातून स्वागत झालेले असून आता अनेकजणांनी त्यांचे अनुकरण करीत पुस्तक भेट देण्याचा छंद जोपासला आहे.आपले समाज सेवेचे हे व्रत यापुढेही सुरूच राहणार असल्याचे हिरवे सर सांगतात.पत्रकार समिती कडून सन्मान प्राप्त झाल्याने हिरवे सरांचे सर्वत्र कौतुक होत असून हिरवे सरांनी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष अशोक म्हात्रे व राजेंद्र लाकेश्री यांचे आभार व्यक्त केले आहेत.