सोलापूर प्रतिनिधी
सोलापूर शहर जिल्हा महिलांच्या वतीने ३९ व्या महिला काँग्रेसच्या स्थापनादिना निमित्त काॅग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात आले.
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांच्या हस्ते काॅग्रेस भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण करुन सलामी देण्यात आली. तसेच माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व स्व.राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महिला अध्यक्षा कु.हेमाताई चिंचोळकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या, दिनांक १५ व १६ सप्टेंबर १९८३ मध्ये अखिल भारतीय काँग्रेसचे अधिवेशन बेंगलोर येथे भरले होते त्यावेळेस माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी व स्व.राजीव गांधी यांनी महिला काँग्रेसला स्वतंत्र फ्रंटलचा दर्जा देवून महिलांचा सन्मान वाढविला व वेगळी ओळख महिला काॅग्रेसला मिळवून दिली. या महिला काँग्रेसच्या माध्यमातून सध्या मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जी प्रचंड महागाई वाढली, गॅस सिलेंडरचे दर वाढले, बेरोजगारी वाढली, महिलांवर अत्याचार वाढलेत महिला अत्याचार करणाऱ्यांना भाजपचे नेते पाठीशी घालत आहेत, सोलापूरचा पाणीप्रश्न, महिलांचे प्रश्न, आरोग्याचे प्रश्न या सर्वांच्या विरोधात जनांदोलनाच्या माध्यमातून महिला कॉंग्रेस लढा उभा करणार आहे.
याप्रसंगी मिठाई वाटप करुन महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यांत आल्या.
कार्यक्रमास महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुमन जाधव, उपाध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, शोभा बोंबे, विणा देवकते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, सेवादलाचे व माजी नगर सेवक हारुण शेख, शक्कुर शेख, बसंती साळुंके, मुमताज तांबोळी, माया गायकवाड, चंदा काळे, स्नेहल शिंदे, प्राजक्ता घाटे, जाकिया पठाण, अनिता भालेराव आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादलाचे शकुर शेख यांनी केले आभार सुमन जाधव यांनी मानले.