अकोला प्रतिनिधी
केंद्रातील भाजप सरकारच्या भारत तोडो नीतीला आव्हान देण्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत 3500 किलोमीटरची "नफरत छोडो भारत जोडो" यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा महाराष्ट्रात येत असून भारत जोडो यात्रा यशस्वी होण्याच्या दृष्टीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोला जिल्ह्यातील भारत जोडो यात्रा नियोजनाची जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर सोपविली आहे.
भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी आज रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी अकोला येथे अकोला शहर- जिल्हा कॉंग्रेस कमिटी पदाधिकारी कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. व भारत जोडो यात्रा यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे तसेच अकोला नगरवासीयांनी या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
या बैठकीस अकोला शहर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अशोकराव अमानकर, अकोला महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील वानखडे, प्रदेश महासचिव बबनराव चौधरी, प्रदेश सचिव प्रकाशभाऊ तायडे, माजी महापौर तथा प्रदेश सचिव मदन भरगड, प्रदेश सचिव डॉ जिशान हुसैन, माजी विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, अकोला महानगर पालिका अविनाश देशमुख, अर्जुन थानवी, कामगार नेते बद्रुझ्झामा जी, प्रदेश प्रवक्ते डॉ सुधीर ढोणे, डॉ सुभाष कोरपे, इंटक नेता प्रदिप वखारीया, महिला शहर अध्यक्षा पुष्पाताई देशमुख, महिला शहर जिल्हा ग्रामीण अध्यक्षा पूजा काळे, महेंद्र गवई, महेंद्र डोंगरे, यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.