विठ्ठल परिवार व मनसे पदाधिकारी यांनी घेतली पूरग्रस्तांची भेट
पंढरपूर प्रतिनिधी
उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेला पूर आला आहे.
येथील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबिका नगर झोपडपट्टी तसेच सखलभागात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले आहे.
येथील नागरिकांची विचारपूस करण्यासाठी
विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे, भगीरथ भालके आणि मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी पूरबाधित नागरिकांनी सत्ताधाऱ्यांनी विरोधात आक्रोश व्यक्त करून व्यथा मांडल्या.
याची मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी तात्काळ दखल घेऊन पूरबाधित नागरिकांना कायमचे घर देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी विठ्ठल परिवार व मनसेच्या वतीने प्रशासनाकडे केली.
यावेळी कोळी महासंघाचे अरुणभाऊ कोळी, माजी नगरसेवक महंमद वस्ताद, शिवाजी मस्के, अनिल अभंगराव, संजय बंदपट्टे, सोनू माने, मनसेचे शशिकांत पाटील आदींसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
उजणी धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे उजणी धरणाने शंभरी पार केल्याने भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह सोडला जात आहे.
सध्या चंद्रभागेच्या पात्रात १ लाख २० क्युसेक पेक्षा जादा विसर्ग सुरू असल्याने पंढरपूर येथील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबिका नगर झोपडपट्टी तसेच सकल भागात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर येथील नागरिकांचे स्थलांतर लोकमान्य विद्यालय, उपजिल्हा रुग्णालयासमोरील रायगड भवन येथे करण्यात आले आहे.
पाऊस काळात कायमच चंद्रभागेला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणावर येथील नदीकाठीच्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
सदर पूरग्रस्त भागातील नागरिकांची विचारपूस करण्यासाठी रविवारी विठ्ठल परिवार व मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या वतीने पूरबाधित भागाची पाहणी करून लोकमान्य विद्यालय तसेच उप जिल्हा रुग्णालयासमोरील रायगड भवन येथील नागरिकांची विचारपूस करून पूरबाधित नागरिकांचे पुनर्वसन नगरपालिकेकडून राबविण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करून त्यांना तात्काळ घर देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.