मुंबई प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर
"पत्रकार उत्कर्ष समिती,महाराष्ट्राची मुंबई शाखा व श्री.दत्तगुरु प्रतिष्ठान संस्थेने संयुक्तरित्या हिंदी भाषिक दिना निमित्त दत्तगुरु प्रतिष्ठान सभागृह,कामाठीपुरा,मुंबई येथे साहित्यिक,वृत्तपत्रलेखक,कवी,मुक्त पत्रकार,डाॅक्टर,वकील इत्यांदीसह बहुजन समाजातील जेष्ठ नागरीकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार उत्कर्ष समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष डाॅ.अशोक म्हात्रे हे होते.प्रास्ताविक भाषण श्री.दत्तगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.राजेंद्र लंकेश्री यांनी करुन संस्थेच्या कार्याची माहिती सादर केली.तर उपस्थित मान्यवर पाहुण्यांचा परिचय कवी शशिकांत सावंत यांनी करुन दिला.
यावेळी जेष्ठ मुक्त पत्रकार श्री.राजेंद्र लंकेश्री यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या मुंबई अध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र डाॅ.अशोक म्हात्रे यांनी दिले.
याप्रसंगी निवृत्त पोलीस अधिकारी लियाकत सय्यद,महापालिका सभागृह माजी नेते बबन गवस,ज्ञानेश्वर कोळी,शैलेश ठाकुर,कवी विलास खानोलकर,इत्यादी मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित याप्रसंगी जेष्ठ वृत्तपत्र लेखक सर्वश्री सुरेंद्र तेलंग,अनंत दाभोळकर,भाई नार्वेकर,शशिकांत सावंत,सुभाष बाघवणकर,विलास देवळेकर,पत्रकार फिरोज अल्ली शेख,जेष्ठ नागरिक वसंत हरियाण,रघुनाथ शेरे,शंकरराव गड्डम,आनंद मुसळे,टेडु बाबु,तिरुपती आसाम गड्डम,सुधीर गावडे,सत्यनारायण आसाम शेट्टी,बाबु भय्या,शेख अब्दुल करीम,बाबी तळेकर,अशोक परब,मारुती कुंचाल,हेमंत अनुमाला,रमेश कोटा,गजानन महाडीक,राजेश्वर जोगू,लहू नर,सुभाष साठे,डाॅ.दशरथ तांडुर,इत्यादींना शाल,श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन बहुजन समाजातील मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
शेवटी उपस्थितांचे आभार श्री.संतोष कोलगे यांनी मानले.