मुंबई प्रतिनिधी
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बदल्यांना स्थगितीसंदर्भात देखील वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिलं आहे.
निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना स्थगिती नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन दरवर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये होते, त्यावेळी 20 ते 30 टक्के बदल्या होतात, या नियमानुसारच बदल्या होतील असे सांगतानाच निकषात बसणाऱ्या विनंती बदल्यांना कोणतीही स्थगिती नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.