गेला महिन्याभरापासून राज्यभरात जनावरांवरील लंपी या संसर्गजन्य रोगाने हाहाकार माजवला आहे..
अनेक जनावरे या रोगामुळे बळी जात आहेत.. सरकारने मृत जनावरांना देवु केलेली मदत ही अत्यंत तोकडी अशी आहे.. राज्यात दुभत्या जनावरांमध्ये या रोगाचा शिरकाव झाल्याने दुभती जनावरे देखील मृत पावली आहेत.. अशा दुभत्या जनावरांना अवघे 30 हजार मदतीच्या स्वरूपात सरकारकडुन मिळणार आहेत.
तसेच बैल हा शेतकर्यांचा शेतीकामांसाठीचा भक्कम साथीदार असतो. ग्रामीण भागात आजही बैलजोडी म्हणून वैभव मानले जाते परंतु दुर्दैवाने असा बैल जर या रोगाच्या भक्ष्यस्थानी सापडला तर सरकारकडुन अवघे 25 हजार रूपये मिळणार आहेत..ही मदत पुरेशी नाही.
राज्यातील नुकसानग्रस्त पशुधन पुन्हा उभे करावयाचे असल्यास मुबलक मदतीची गरज आहे. त्यामुळे दिवसरात्र गोमातेचा जप करणार्या या सरकारने आता आपले गोमातेवरील प्रेम दाखवण्याची वेळ आलेली आहे.. सरकारने पशुपालकांना मदतीचा भक्कम आधार न दिल्यास भविष्यात याच पशुपालकांना व जनावरांना घेवुन आम्ही रस्त्यावर उतरू आणि शेतकर्यांना योग्य मोबदला मिळवुन देवू.असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रणजीत बागल यांनी दिला आहे.