*भाळवणीतील पाणी प्रश्न पेटणार,ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार*
भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील निरा कालवा शाखा एक व दोन ला नियमित पाणी न सोडल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी आज सकाळी नऊ वाजलेपासून पंढरपूर - सातारा रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की निरा कालव्यातून उन्हाळा हंगामाची पाणीपाळी 27 तारखेपर्यत सोडणे अपेक्षित असताना ही अधिका-यांच्या मनमानी कारभारामुळे पाणी सोडण्यात आले नाही.त्यामुळे ग्रामस्थांना रस्तारोको आंदोलन करावे लागले.या आंदोलनाचे निवेदन संबधित विभागास देवून सुध्दा अधिकारी तेथे उपस्थित राहिले नाहीत.त्यावेळी कार्यालयातून पोलिसांनी शाखाधिकारी गावीत व सहका-यांना आंदोलन स्थळी आणले तरीसुध्दा यावर तोडगा निघू शकला नाही.यानंतर वरिष्ठ अधिकारी मलकापुरे आले,त्यांनी आंदोलकांचे मत न ऐकताच उध्दट उत्तरे दिली.त्यामुळे तर शेतक-यांनी तीव्र संताप व्यकत केला.व संबधित अधिका-यावर गुन्हे नोंदविण्याची मागणी केली.कार्यकारी अभियंता निकम यांनीच भाळवणीसह 22 गावांना पाणी न सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.यावेळी आंदोलकांनी अधिकारी निकम यांचा आंदेलन स्थळी तेरावा घातला.यावेळी अधिकारी व शेतकरी यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी पोलिस अधिक्षक सागर कवडे यांना बोलावून यावर तोडगा काढण्याठी सहकार्य करण्याचे सांगितले.पण अधिकारी चर्चा करणयास सहकार्य करीत नसल्यामुळे शेतक-यांनी अांदोलन स्थगित करून चार तास ठप्प राहिलेली वाहतूक सुरळीत केली.आणि सर्व बावीस गावांनी पाणी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यकत केला.यावेळी पोलिसांनी बंदोबस्तासाठी छावणीच उभारली होती.यावेळी कल्याणराव काळे,संभाजी शिंदे,भगवान चौगुले,सुरेश देठे,दिपक पवार,डाँ.नंदकुमार जगताप,हरिभाऊ शिंदे,जयवंत शिंदे,दिपक गवळी,अँड.नागेश काकडे,राहुल हातगिने,नवनाथ माने,बाळासाहेब पाटील,धनाजी शिंदे व शेतकरी मोठया संखयेने उपस्थित होते.
चौकट - जोपर्यत पाणी मिळत नाही तोपर्यत मतदानावर बहिष्कार टाकू व बावीस गावात कोणत्याही राजकीय पक्षास सभेची परवानगी देऊ नये,असा ठराव करणयात आला.