पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
संतपेठ पंढरपूर ज्येष्ठ समाजसेवक व कामगार नेते राजाराम नाईकनवरे उर्फ दादा यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेल्या, असून यामध्ये राजाराम नाईकनवरे हे समाजातील अत्यंत प्रेमळ व दयाळू गोरगरिबांच्या समक्ष जाणणारे. आणि सामाजिक राजकीय,कला,क्रीडा,सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक माध्यमातून संतपेठ भागातील आणि परिसरामध्ये आपल्या कामातून ओळख निर्माण करणारे दादा.
दादांनी सर्व बहुजन समाजाला एकत्र घेऊन नेहमीच काम करायचे, देशी सेवा हीच आपली समाजसेवा असे नेहमी दादा सांगत दादांचे हास्य चेहरा व मनमिळाऊ सभाव प्रत्येक लोकांना खूप आवडायचे. दादांना खूप समाजामध्ये मान, सन्मान, प्रतिष्ठा व त्यांचा आदर्श विचार युवा पिढींना घेण्यासारखा आहे.
स्वर्गीय राजाराम नाईकनवरे उर्फ दादांना आपल्या देशाचा खूप अभिमाना वाटत. एक मुलगा सीमेवर भारत मातेचे रक्षण करत.असताना आणि दुसरा मुलगा प्रत्येक समाजासाठी अहोरात्र झटणारा अशा आपल्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार देण्याचे काम दादाने आपल्या माध्यमातून केले अभिमान आहे.
राजाराम नाईकनवरे यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक चढउतार पाहिले परंतु त्या संघर्षावर मात करून त्यांनी आज समाजामध्ये आदर्श निर्माण केला.दादा नेहमी सांगत की प्रत्येक समाजातील मुली- मुलांना चांगले संस्कार घडावेत आई-वडिलांचे नाव मोठे करावे, असे नेहमी दादा तळमळ सांगत म्हणून,आज त्यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम प्रतिष्ठान संघटना व मित्रपरिवार यांच्या वतीने घेण्यात आले. तसेच कार्यक्रमाची रूपरेषा प्रा दत्तात्रय कांबळे यांनी माहिती आणि सूत्रसंचालन केले.
प्रतिष्ठानच्या वतीने पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणे कार्यक्रम घेण्यात आले पंढरपूर शहरांमध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता. पाणपोई कार्यक्रम घेण्यात आला.तसंच वृद्धा आश्रम गोपाळपूर येथे माता पिता ना मिष्टांन भजन कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर पंढरपूर शहरामध्ये अनेक भागातून वृद्ध माता-पिता ज्येष्ठ नागरिक त्यांना एक टाइम जेवण सुद्धा मिळत नाही. अशा लोकांना माऊली शहरी बेघर निवासीस्थानी मिष्ठांना भोजनाचा ठेवण्यात आला.
यावेळी अनिल दादा सावंत (भैरवनाथ शुगर समूह उद्योग चेअरमन),डॉ सौ प्रणिताताई भालके (नगराध्यक्ष न.पा पंढरपूर) डॉ शुभम आगवणे ( पंचायत समिती सभापती) प्रदीप कुमार मोरे (कॅप्टन ) नागनाथ पांढरे (इंजिनीयर ) वामन तात्या बंदपट्टे,नगरसेवक,दयानंद वायदंडे,दिलीप देवकुळे,अंबादास वायदंडे. श्याम गोगावले. कृष्णा वाघमारे म कसबे,दिपक नाईकनवरे,डॉ शेळके ,प्रा दत्तात्रय कांबळे,भीमराव वाघमारे,शैलेश आगवणे,उमेश सर्वगोड, किरण माळवदे,औदुंबर कांबळे, बापू खिलारे,सुखदेव माने रतन नदाफ, हिरालाल रणदिवे,धनाजी लोखंडे, ब्रह्मदेव वायदंडे, अमित वायदंडे, राहुल नाईकनवरे, औदुंबर वायदंडे,सुदाम खिलारे, सागर नाईकनवरे,अतुल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी पणे पार पडण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते दिपक नाईनवरे व स्व राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्था. संतपेठ पंढरपूर आणि संघटना मित्रपरिवार यांनी प्रयत्न केले.


