पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
विश्व हिंदू परिषद वतीने जाती पाती छोडो और सारे हिंदू जोडो आशा घोषणा देत समरसतर यात्रारथ पंढरपूरातील मेहतर कॉलनी येथे दाखल झाली. या समरसता यात्रेचा रथ मागील चार दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट येथून सुरू बार्शी, कुर्डुवाडी, अरण, मंगळवेढा मार्गे पंढरी नगरीत दाखल झाला .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. हेडगेवार यांनी सामाजिक न्यायासह हिंदू समाजात परस्पर सन्मान आणि समानता निर्माण व्हावी या साठीच कार्य केले. अस्पृश्यता आणि जातीभेद मिटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेने अनेक आंदोलने आणि सामाजिक उपक्रम राबवले.
या समरसता यात्रेतून गावा गावातील सर्वच मंदिरातून सर्व जातींना प्रवेश तसेच एक गाव एक स्मशान तसेच सनातन राष्ट्र,कन्या-भगिनी, मंदिर- संत यांचे रक्षण करणे , सामाजिक व्यवहारातून अस्पृश्यता आणि उच्चनीयता संपवणे आणि समर्थ राष्ट्राची निर्मिती करून हिंदू सारा एक हा भाव मनामध्ये प्रकट करण्याचा संदेश सर्व हिंदू बांधवांना देण्यात आला.
यावेळी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्रीय मंत्री नरेश पाटील, प्रांतअध्यक्ष गजानन धरणे, प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत समरसता प्रमुख निखिल कुलकर्णी,विभाग सहमंत्री विजय पिसे, समरसता प्रांत सदस्य रवींद्र साळे, जिल्हा सहमंत्री गोपाळ सुरवसे , बजरंग दल जिल्हा संयोजक श्रीनाथ संगीतराव, नगरसेवक सौरभ थिटे समाज सेवक, अंबादास दोडिया, मातृशक्तिविभाग संयोजिका मालती गंभीर , तुकाराम खंदाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

