सदरची बातमी तेज न्यूज ने प्रसिद्ध केली होती
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
उजनी धरणावरील पाणलोट क्षेत्रामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यानंतर पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येते तसेच वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर पूर नियंत्रणासाठी वीर धरणातून ही नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात येते त्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड प्रमाणात वाढ होते.
त्यामुळे भीमा नदीच्या बॅक वॉटर मुळे तसेच कासारगंगा पाणलोट क्षेत्रामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाल्यानंतरही पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील कासाळगंगा पुलावरती नेहमीच पाणी येते व त्यामुळे तो पूल वाहतुकीसाठी बंद करावा लागतो.
त्यामुळे शेळवे, वाडी कुरोली, पिराची कुरोली, पटवर्धन कुरोली ,नांदोरे, देवडे, खेड भाळवणी, बंडीशेगाव अशा अनेक गावातील शेतकऱ्यांचे त्या पुलावरील वाहतूक बंद झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान होते तसेच या भागात अनेक शिक्षण संस्था ही आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक नुकसान होते.
तरी त्या पुलाची अत्यावश्यक उंची वाढवावी अशा पद्धतीची मागणी शेळवे गावचे पोलीस पाटील एडवोकेट नवनाथ पाटील यांनी केलेली होती ही बातम्या तेज न्यूज ने प्रसिद्ध केली होती.या बातमीची दखल घेत आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या पुलाची उंची वाढवण्याबाबत पाहणी केलेली आहे.

