पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कासाळगंगा ओढ्यावरील पाणलोट क्षेत्रामध्ये कटफळ महूद भाळवणी महिम धोंडेवाडी जैनवाडी गार्डी उपरी बंडीशेगाव शेळवे या गावांमध्ये जोरदार पाऊस झालेला होता. त्यामुळे शेळवेतील कासारगंगा ओढ्यावरील पूलाची पाहणी पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी केली.
त्यामुळे कासाळगंगा ओढ्याला तीन-चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे.नुकतेच महीम येथील 2 मुले या पाण्याच्या प्रवाहात मरण पावली आहेत.कासाळगंगा ओढ्याला पूर आलेला आहे .कासाळगंगा ओढ्यावरील अनेक पूल पाण्याखाली गेलेले आहेत .त्यामुळे अनेक पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे. पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे येथील कासाळगंगा ओढ्यावरील पुलावरून चार दिवसापासून पंधरा ते वीस फूट पाण्याचा प्रवाह वाहत आहे .तो सध्या तीन ते चार फूट पाण्याचा प्रवाह वाहत आहे.हा पूल वाहतुकीसाठी सध्याही बंद ठेवण्यात आलेला आहे. या पुलाची पाहणी आज पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेखा घनवट यांनी केली.
त्यावेळी घनवट म्हणाल्या की, या परिसरातील सर्व नागरिकांनी सतर्क व सावधान राहण्याच्या सूचना केली. तसेच जोपर्यंत या पुलावरून पाण्याचा प्रवाह आहे. तोपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे .प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. त्याच्या अंमलबजावणी करण्यात यावी.नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये.आपण आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी. असे आवाहन घनवट यांनी केले आहे.
यावेळी त्यांच्या समवेत पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अजित मिसाळ, अमर सुरवसे, सुनील लोंढे, तसेच शेळवे गावचे पोलीस पाटील ॲड.नवनाथ पाटील तसेच शेळवे परिसरातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

