विशेष लेख, आषाढी सोहळा उद्योगाचे महा विद्यापीठ
लेखन नंदकुमार देशपांडे ज्येष्ठ पत्रकार
आषाढ महिना लागला की राज्यातील तमाम विठ्ठल भक्तांना भाविकांना वारकरी संप्रदायातील तमाम मंडळींना एकादशीच्या सोहळ्यासाठी लगबग करावी लागते आषाढी सोहळा हा पंढरी नगरीतील एक अविस्मरणीय असा भक्ती सोहळा असतो या सोहळ्यामध्ये लहान थोर गरीब श्रीमंत दुबळा कष्टकरी असा 12 बलुतेदार वर्गातील भक्तांचा मेळा न बोलता न निमंत्रण देता पंढरी नगरीत आषाढी सोहळ्यासाठी साधारणतः पंचमी ते पौर्णिमा या काळामध्ये पंढरी नगरीत वास्तव्यास असतो. आषाढी सोहळा म्हणजे व्यापार उद्दीन उद्योगाचे महाविद्यापीठ म्हणल्यास गैर ठरणार नाही इथे कोणताही व्यवसाय सुमारे 15 ते 20 दिवसाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो या काळात पंढरी नगरीत कोट्यावधीची उलाढाल होत असते म्हणूनच भक्तीची उद्यम नगरी रोजगाराचं विद्यापीठ असंच म्हणावं लागेल या ठिकाणी आषाढ महिना सुरू झाला की साधारण पंचमीपासून सर्वांनाच विठ्ठल नगरीची ओढ लागलेली असते या ठिकाणी उद्योग व्यवसाय करण्यासाठी केरळ हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश आदी राज्यातूनही छोटे-मोठे व्यवसायिक आपला व्यवसाय करण्यासाठी येत असतात ही सर्व मंडळी हातावर पोट असलेली व मोठमोठा यात्रा मध्ये व्यवसाय उद्योग करणारी आहेत शिवाय पंढरीतील स्थानिक व्यावसायिक दुकानदार लहानसा दुकानदार हे आपला व्यवसाय यात्रेच्या काळामध्ये करतात पूर्वी पंढरी नगरीत यात्रेच्या दरम्यान तुटपुंज्या सोयी होत्या त्यावेळेस आठ ते दहा वयोगटातील तसेच मध्यम युवा वर्ग हे वारकऱ्यांसाठी शरीर धर्म ओळखण्यासाठी 50 पैसे ते एक रुपयाला एक डबा किंवा एक तांब्या पाणीही विकले जात होते काळा बदलला सुख सोयी बदलल्या व्यवसाय बदलत गेले जुन्या जाऊन नव्या ठिकाणी सोयी वारकऱ्यांसाठी आंघोळीची सोय शरीर धर्म ओळखण्याची सोय अशा सुविधा प्रशासनाने शासनाने उपलब्ध केल्या असल्या तरीही पंढरपुरात आजही थोड्या प्रमाणात प्रमाणात त्रुटी जाणवतात हे नाकारून चालणार नाही. पंढरपुरात यात्रेच्या काळात हातावर फिरून शहरभर व्यवसाय करणारे गोप विकणारे प्लास्टिकच्या तोरणापासून देवतांच्या गळ्यात हार घालण्यापर्यंत विविध असे वस्तू विक्रीसाठी पंढरी नगरीत हे लोक घेऊन विक्री करून आपला उदरनिर्वाह करत असतात या कालावधीत या सर्वांना खर्च वजा जाता साधारणतः 20 ते 25 हजार रुपये पदरात पडतात असे गोप विकणारे फुलांच्या विशेषतः प्लास्टिकच्या तोरण विकणाऱ्या माणसाने चर्चा करताना बोलण्यातून जाणवले असा हा सर्वांना उद्योग देणारा उद्योगाचे विद्यापीठ म्हणजेच पंढरी नगरी होय या नगरीमध्ये स्थानिक व्यापारी वरील प्रमाणे व्यवसाय करत असताना त्यांच्या जोडीला शेकडोजन फिरस्ती व्यापारी आषाढी यात्रेच्या निमित्याने पंढरीत दाखल झालेले असतात ते किमान पंढरी नगरीत 25 ते 30 दिवसांच्या मुक्कामी असतात हे त्यांच्या येथील वास्तव्यावरून दिसून येते पंढरपुरात पूर्वी चंद्रभागेला पाणी असताना वाळवंटामध्ये सुद्धा वाळवंटात फिरवून चहा विकणारे गोळ्या बिस्कीट विकणारे किरकोळ व्यवसाय करणारे त्या काळी पंढरी नगरीत मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. यात्रा काळात चंद्रभागेच्या वाळवंटात पहाटेच्या वेळेस वारकरी मंडळी भक्तमंडळी भाविक मंडळी हे चंद्रभागा स्नान केल्यानंतर त्यांच्या कपाळाला भागवत संप्रदायाचा मानाचा असा गंधाचा टिळा लावणारे पाच 50 जण चंद्रभागेच्या वाळवंटात या लोकांच्या कपाळाला अष्टगंध बुक्का याचा टिळा लावून भाविकांनी भक्ताने वारकऱ्यांनी त्याकाळी एक दोन रुपये दिल्यानंतरही गंध लावणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाची लकीर उमटलेली दिसून येत होती आता बऱ्याच वेळा चंद्रभागा ही कोरडी असल्याने गंध लावणारी मुले आता या व्यवसायात मुलीही लहान आले असून वारकऱ्यांना भाविकांना भक्तांना महाद्वार ते पश्चिम द्वार ते चौफळा गोपाळ कृष्ण मंदिर परिसरापर्यंत हे गंध लावणारे व्यक्ती येणाऱ्या भाविकांना कपाळाला गंध लावून त्यांच्याकडून दोन पाच रुपये घेऊन वारीच्या काळात शेकडो रुपयांनी कमाई करतात या ठिकाणी या त्याच्या काळात कोणत्याही उद्योग व्यवसायाला तोटा नाही. स्थानिक व्यापाऱ्याबरोबर बाहेर गावच्या जिल्ह्यातून तालुक्यातून प्रदेशातून हातावर व शहरभर फिरून विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आषाढी यात्रेचा सोहळा म्हणजे ही एक व्यवसाय करण्याची सुवर्णसंधीच असते स्थानिकांचा तर याच वारीवर जास्त भर असतो आषाढी वात्र संपल्यानंतर कार्तिक यात्रेपर्यंत चा सुमारे अडीच ते तीन महिन्याचा कालावधी हा आषाढी यात्रेत मिळवलेल्या कमाईवर केला जातो तसेच फिरस्ती लोकांसाठी अशीच गुजरात असते त्यामुळे पंढरी नगरी ही उद्योगाची जननी म्हणल्यास व अर्थार्जनाचा साधन म्हणल्यास वावगे ठरवत नाही या ठिकाणी मार्केटिंग ही मोठ्या प्रमाणात केले जाते त्याला मुख्य कारण राज्यातून जिल्ह्यातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंनी वारकरी भाविक भक्त हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनास येतात त्यामुळे एखादी नवीन वस्तू तयार केली की ती हमखास पंढरीतील आषाढी यात्रेत विक्रीस आलेली पाहावयास मिळते आषाढी यात्रेत लहान लहान वस्तू विक्रीस या कालावधीत आलेली असते या विक्रीतून रोजची शेकडोणी कमाई केली जाते व त्यावरच या सर्वांचे गुजरात होत असते आषाढी यात्रा म्हणजे सर्व व्यवसायाचे मार्केटिंगचे महाविद्यापीठ च आहे असे म्हणण्यास गैर ठरणार नाही त्याचे कारणही तसे आहे वरील छायाचित्रातून आपणास कल्पना येईल की प्लॅस्टिकच्या पासून बनवलेल्या गुलाब फुलापासून ते दारावर लावणाऱ्या तोरणापासून तसेच सजीव फुला नाही मागे टाकील अशा फुलांच्या हारांचाही व्यापार या ठिकाणी या कालावधीत मोठ्या प्रमाणात होत असतो पंढरी नगरीत इतरही व्यवसाय मोठ्या प्रमाणात असतात. आषाढी एकादशी चा सोहळा हा एक आनंददायी पर्वणी असून वारकरी विठ्ठल भक्त भाविक यांना अध्यात्मिक मानसिक शारीरिक बळ देणारा असा हा अनुपम सोहळा सुमारे पंधरा दिवस चाललेला असतो या काळात सर्वत्र जिकडे पाहावे तिकडे रंगीबेरंगी शुभ्र वस्त्र परिधान केलेले पारंपारिक पोशाख घातलेले स्त्री-पुरुष महिला अमालवृद्ध पाहण्यास मिळतात या ठिकाणी कोणताच भेदभाव नसतो अशीही पांडुरंगाच्या वास्तव्याने पवित्र आणि पुनीत असलेल्या पंढरी नगरीत आषाढी एकादशीचा सोहळा हा भक्तीचा अनुपम्य असा आनंद देणारा वर्षभर ऊर्जा देणारा मनात जगण्याची उर्मी देणारा अशा ह्या सावळ्या विठ्ठला चा आषाढीचा सोहळा पंढरी नगरीत संपन्न होतो पंढरी नगरी ही एक यात्रा काळात सर्वांच्या हाताला काम देणारी भक्तीमय असे व्यापार उद्योगाची महा विद्यापीठ सोय आहे हे नाकारून चालणार नाही अशा ह्या भक्तिमय सोहळ्यास सहभागी होण्याचे भाग्य कोणत्या ना कोणत्या रूपाने सर्वांना लागते हे एक भाग्यच म्हणावे लागेल अशा या आषाढी यात्रेच्या सोहळ्याला सुरुवात झाली असून हा सोहळा सुमारे पंधरा दिवस चालला जातो म्हणूनच म्हणावे वाटते आषाढी यात्रा व पंढरीची यात्रा म्हणजे व्यापाराचे महाविद्यापीठ व रोजगार मिळवण्याचे त्याचे शिक्षण देण्याचे हे विद्यापीठ आहे. पूर्वीच्या काळी शाळा शिकणारी मुले ही यात्रा काळात छोटासा व्यवसाय व गंध लावून येणाऱ्या पैशातून आपले शाळेचे पुस्तके व शालेय गणवेश यात खरेदी करून शाळा शिकणारी मुलेही आम्ही पाहिली होती आत्ताचा काळ बदलला आहे परंतु लहान मुलांना यात्रा काळात उद्योग मिळतो इथे गंध लावणारे मुले मुली असून रोज ते शेकडो रुपये कमावतात परंतु ते घरच्याला किती उपयोग येतात स्वतःला किती उपयोग येतात हा एक संशोधनाचा विषय आहे कारण यातील गंध लावणारी काही मुले हे व्यसनाधीन गेल्याचे गंध लावून घेताना जाणवताना दिसून येते कारण येथे येणारा व मिळणारा रोजचा ताजा पैसा आहे त्यामुळे या मुलावर वेळीच संस्कार व आळा घातल्यास मिळणारा पैसा सत्कारणी लागल्याशिवाय राहणार नाही असेही सूचित करावे वाटते लिहिण्यासारखे बरेच आहे पंढरपुरात यात्रा काळात सर्वच उद्योग व्यवसाय तेजीत चाललेला असतो म्हणूनच आषाढी एकादशीचा सोहळा पंढरी नगरीतील एक उद्योगाचे व्यापारीकरणाचे महा विद्यापीठ म्हणले पाहिजे ते आहेच.