शिक्षकांना मोबाईल मध्ये कोणी गुंतवले ?
सध्या समाज माध्यमातून शिक्षकांवर शेलक्या शब्दांत शब्द सुमनांचा मारा वाचत असताना.मनाला कुठे तरी ठेच पोहोचते.. म्हणून आपले ही दुःख मांडावे म्हणून....
आज शिक्षकांना शिकविण्यापेक्षा शाळा बाह्य कामातच जास्त गुंतवायचे षडयंत्र रचले जात आहे.*शिक्षकेत्तर भरती बंद करून* शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा भार टाकून शिकविण्यापेक्षा इतर कामात शिक्षक कसा व्यस्त राहील.. यांचे कुभांड रचले जात आहे.
जि.प.प्रा.शाळा व शासकीय अनुदानित शाळा बंद पाडून राजकीय लोकांनी उभारलेल्या टोलेजंग इमारती मधील... इंग्रजी माध्यमाच्या म्हणजे सोन्याची कोंबडी वजनदार बनावी यासाठी सध्या महाराष्ट्रात व्ह्यू रचना आखली जात आहे.यातून बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणाचे दोर कापण्याची मोठी खेळी जात आहे.परीक्षा पध्दती.. शिक्षकांना पद्धतशीर बदनाम करणे, शिक्षण व्यवस्थेत भ्रष्टाचाराची प्रकरणे, शिक्षक परीक्षा पद्धतीतील सावळा गोंधळ, पवित्र पोर्टल खरंच पवित्र आहे का..? यावर शंका घेऊ लागली आहे...! स्वप्न पाहायची ऑलम्पिकची पण त्यांना मार्गदर्शन करणाऱ्यांना गुंतवणूक ठेवायचे मोबाईल मध्ये.. किंवा त्यांची पदे भरताना हात आखडता घ्यायचे.. धोरण शासकिय स्तरावर का बरं घेतले जात असावे.
आज विद्यार्थ्यांचे व पालकांचे समुपदेशन करण्याची वेळ का आली.आजही गरीबांची मुले शासकीय अनुदानित शाळा व झेडपी शाळांतून शिकत आहेत.परंतू शासनाने पद़्धतशीरपणे विद्यार्थी,पालक, शिक्षक व संस्थाचालक यांची गळचेपी करण्याची संधी शोधून सरकारी शाळा बंद पडण्याची स्पर्धा सुरू केली आहे.ज्या पद्धतीने शासकीय उद्योगधंदे आजारी पाडून खाजगीकरण करण्याचे प्रयत्न चालू आहेत.. तसेच प्रयत्न सध्या गरीबांच्या शिक्षणाची शिदोरी बंद पाडून खाजगीकरणाचा डाव टाकले जात आहेत.शाहू - फुले- आंबेडकर तसचे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचारांना कुचल्याने काम सध्या महाराष्ट्रात व देशात सुरू आहे.
शिक्षक सध्या कामापेक्षा मोबाईल मध्ये जास्त दिसतात.पगार खुप घेतात.... यांना काहीच काम नसते.विद्यार्थांना लिहिता व वाचता ही येईना.दहावी, बारावी भले पदवीधर मुलांना ही वाचता लिहिता येत नाही....मग ते पास कसे होतात... यावर पण संशोधन व्हायला हवे..पण हीच मुले पुढे व्यवस्थेला टक्कर देऊ शकत नाही...हेच ओळखून पद्धतशीर काम केले जात तरी नाही ना....
शेवटी विषय राहिला शिक्षकांच्या मोबाईलचा.... शिक्षण विभागातून कधी व केव्हा कोणता मेसेज पडेल ही सांगता येत नाही.कोणती ऑनलाइन माहिती केव्हा मागितली जाई..याचे काही खरे नाही.सतत ऑनलाइन माहिती व ऑनलाइन कामात शिक्षकांना गुंतवायचे षडयंत्र रचले जात आहे.शिकवणी पेक्षा ऑनलाइन माहितीचा धडाका सुरू आहे.शिक्षकांनी शिकवायचे की हा ऑनलाइन तमाशा पाहायचा.... वरून समाज माध्यमातून शिक्षकच बदनाम...शिक्षक शिकण्यापेक्षा मोबाईल मध्ये डोकं जास्त घालतात...१ ते २ टक्के शिक्षक मोबाईल वेडे असू शकतात.परंतू संपूर्ण शिक्षक बांधव नाहीत.हे लोकांना पटवून सांगण्याची वेळ का आली असावी.
शिक्षकेत्तर भरती बंद करून... शिक्षकांना मोबाईल संन्याशी कसे करणार याचे उत्तर मायबाप पालकांनी... शिक्षण तज्ञांनी.... शिक्षण व्यवस्थेने तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी व शिक्षणमंत्री व शिक्षणमहर्षी यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे ही कळकळीची विनंती....
शिक्षकांना मोबाईल वेड नाही... त्यांनी मोबाईलमध्ये गुंग राहण्याची गोळी शोधून काढून बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणात आडकाठी घालण्याचे धोरण आणून खाजगी शाळांना नवसंजीवनी तरी पुरवत नाही ना..?
तुमची सरकारी माहिती भरून भरून.... मोबाईल सतत स्क्रीन पाहून शिक्षकांचे डोळ्यांचे नंबर वाढले पण .... माहिती भरायची काही कमी होत नाही.वरून शिक्षक बदनाम....
समाजसेवक,शासकीय पुरस्कार प्राप्त,मी महाराष्ट्राचा व महाराष्ट्र माझा....म्हणणारे शिक्षकांवरील व शिक्षण व्यवस्थेला लागलेला चष्मा कामयचा दूर करण्यासाठी कधी तरी प्रयत्न करणार का...?
फक्त शिक्षण हे वाघीणिचे दूध आहे....हे कागदोपत्री म्हणायचं...पण ते सर्वसामान्यांना पिऊ द्यायचे नाही... यांचे घाट का घालता...!
प्रा.आनंदा आलदर ✒️ 9765066247