नागपूर प्रतिनिधी तेज न्यूज
नागपूर कोंढळी येथील लखोटिया भुतडा विद्यालय या शाळा प्रशासनाने ५ वि ईयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थाचे टि. सि थेट पालकाला पाठवुन विद्यार्थ्याला शाळा बाह्य केले व त्या अगोदर शुलकासाठी वारंवार सर्व विद्यार्थ्यांच्या समोर उभे करुन अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक त्रास दिल्याबद्दल पालक अबदुल खालिद अबदुल गफार शेख यांच्या तक्रारी नुसार, शाळा मुख्याध्यापक आशुतोष पवार, उपमुख्याद्यापक योगेश चौधरी व वर्ग शिक्षक अमोल वडयाळकर यांच्यावर अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ कलम ७५ व बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम २००९ मधील कलम २७ प्रमाणे गुन्हा कोंढळी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला.
या प्रकरणी स्थानिक समाजसेवक इमरान हबीब शेख यांनी मुंबईतील शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांच्या कडे मदत मागितली होती, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालक कोंढळी पोलिस ठाण्यात दाखल झाले व फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला, पोलिस अंम दाराने गुन्हा दाखल न करता उद्या या, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतो अशी उडवा उडवीची उत्तरे दिली, या प्रकारामुळे नितीन दळवी यांनी बाल कल्याण समितीच्या अधिकारी पुजा कांबळे यांना सर्व प्रकार समजवला व त्यांनी पोलीस अमलदाराशी चर्चा केल्यावर आखेल ५ तासांनी गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ कलम ७५ नुसार आरोपीस ३ वर्षांची कैद १ लाख रु दंडाची तरतूद आहे.
नागपूर कोंढाळी येथील याच शाळेने सरकार करून आरटीई शुल्काची परिपूर्ती म्हणून रक्कम मिळून सुद्धा ५७ गरीब पालकांची फसवणूक करून लाखो रुपये शुल्क अनधिकृत रित्या वसूल केले होते, शिक्षण विभाग कार्यवाही करत नसल्याने पालकांनी हे प्रकरण मुंबईतील शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांच्या कडे नेले, व त्यांच्या तक्रारींवर कार्यवाही करत अखेर या शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शासनास सादर झाला, याचा राग मनात ठेऊन तक्रारदार पालकांच्या विद्याथ्यांना असा त्रास देण्याचा प्रकार शाळा करत आहे, सादर प्रकरणातील पालक खालिद शेख हि शाळेच्या फसवणुकी विरोधात लढत होते, त्याचाच राग मनात ठेवून शाळेने त्यांचा मुलाला शाळा बाह्य केले असे नितीन दळवी यांचे म्हणणे आहे, नितीन दळवी यांनी शासनाकडे शाळेचेसंचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली होती व त्यावर आता कारवायांची प्रलंबित आहे.
शासन निर्णय २०२१ व सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल प्रमाणे, शुल्क साठी कुठल्याच विद्यार्थ्यांची निकाल रोखणे, दाखले अडवणे , हॉल तिकीट अडविणे, परीक्षेस बसू न देणे असे प्रकार शाळा करू शकत नाही, तरी शाळा असे प्रकार शाळा सर्रास करतात व अधिकारी ठोस कार्यवाही करत नसल्याने, शाळा बिनधास्तपणे असे प्रकार करता, नितीन दळवी यांचे म्हणणे आहे कि सरकार व शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ठोस पाऊले उच्चली पाहिजे, तरच असे प्रकार रोखता येतील.