गार्डी प्रतिनिधी तेज न्यूज
गार्डी ता पंढरपूर येथील कासाळ ओढ्याला पाणी आल्यामुळे गार्डी कडून भाळवणी ला जाणारा रस्ता हा पाण्याखाली गेला असून गार्डी गाव विभागले गेले आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, पशुपालक, दुग्धउत्पादक तसेच मजूर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाणी अडवण्यासाठी केलेल्या चुकीच्या पद्धतीमुळे आणि निष्क्रिय प्रशासकीय यंत्रणेमुळेच ही जीवघेणी वेळ गावाकऱ्यांवर आली आहे.
मागील अनेक दिवसापासून रस्त्याची मागणी करूनही प्रशासन यावर कोणताही तोडगा काढत नसून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता टाळता येत नाही. त्याचबरोबर येत्या सोमवारपासून शाळा सुरु होणार असून शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.
प्रशासकीत यंत्रणेने लवकरात लवकर यावर मार्ग काढून गार्डी गावातील रस्ता सुरु करावा ही मागणी होत आहे.