मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज गणेश हिरवे
मुंबई कुर्ला पश्चिम येथील गांधी बाल मंदिर शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५.२६ मधील विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी शाळेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १६ जून २०२५ रोजी खूप पाऊस पडत होता तरीही विद्यार्थ्यांची उपस्थिती छान होती.
प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार गणेश हिरवे यांनी शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ, एनसीसी प्रमुख शिक्षक विश्वनाथ पांचाळ आणि इतर शिक्षक वृंदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले आणि मुलांना पुस्तक वितरित केली.मुलांशी संवाद साधताना हिरवे यांनी आपली नियमित कामे आपण न चुकता केली पाहिजेत तसेच घरी देखील अभ्यासा बरोबरच आई वडिलांना मदत करून या देशाचे एक चांगले नागरिक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.
शाळा हे देशाचे उत्तम नागरिक बनण्याची पवित्र वास्तू असून शिक्षक, पालक विधार्थी हे घटक शाळेचे कणा असल्याचे सूतोवाच केले.या शाळेत वर्षभर विविध उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविण्यात येतात.शाळेत येणारी मुलं गरीब आणि मध्यमवर्गीय असली तरी अभ्यासात आणि खेळात हुशार असून एन सी सी मधील अनेक विधार्थी सैन्यात दाखल झाल्याचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ म्हणाले.