भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भव्य निबंध स्पर्धेमध्ये भाळवणी येथील ऋतुजा सुधाकर शेंडे या विद्यार्थिनीचा 13 ते 16 वयोगटांमध्ये दुसरा क्रमांक मिळाला आहे. त्याबद्दल ऋतुजा शेंडे हिचा सत्कार सरपंच रणजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपसरपंच नितीन शिंदे माजी सरपंच राजकुमार पाटील,डॉ. नवनाथ खांडेकर, प्रवीण लिंगडे , हणमंत केसकर,मनोहर माने,अनिकेत माने,वैभव लिंगे,राहुल ताटे, तेजस खाडे, विश्वजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
ऋतुजा शेंडे हिने अहिल्याबाई यांचे जीवन चरित्र त्या पराक्रम आणि लोक कल्याण या विषयावर निबंध लेखन केले होते. या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेमध्ये ही ऋतुजा शेंडे हिने प्रथम क्रमांक मिळवला होता. तिला परफेक्ट कॉम्प्युटरच्या संचालीका धनश्री पवार यांचे मार्गदर्शन लाभले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण , विजय चौधरी,प्रदेश संयोजक धनराजजी विसपुते यांच्या उपस्थितीत शेंडे हिचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. नवनाथ खांडेकर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माढा लोकसभा पदवीधर प्रकोष्ठचे संयोजक प्रशांत माळवदे यांनी केले तर आभार परफेक्ट कॉम्प्युटरचे संचालक आर के पवार यांनी मानले.