मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
शाळेचे शुलकासाठी विद्यार्थ्यांना शाळेतून शाळाबाह्य करुन त्यांना मानसिक त्रास देण्याचा सपाटा महाराष्ट्रातील खाजगी शाळा करत असल्याची बाब निदर्शनास आली आहे, सरकार कडून दाद मिळत नसल्याने पालक शेख अब्दुल सत्तार यांनी शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांच्याशी संपर्क साधून लेखी तक्रार केल्यावर हि बाब उघड झाली आहे.
मुंबई उमर खेडी येथील नामांकित शाळा सफा हाय स्कूल व ज्युनियर कॅलेज या शाळेने ११ विद्यार्थ्यांना शुल्कासखठी शाळा बाहय करणाची गंभीर बाब समोर आल्यावर शिक्षण हक्क कार्यकर्ते नितीन दळवी यांनी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग व शालेय शिक्षण विभाग यांच्याकडे केली, शासन निर्णय व मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अपमान करून शाळा मनमानी करत पालकांची व विद्यार्थ्यांची पिळणुक करत असल्याचा आरोप नितीन दळवी करत आहेत, शासन व शिक्षण विभागातील अधिकारी ठोस पावले उचलत नसल्याने खाजगी शाळा मनमानी करत आहेत.
नागपूर येथील लखोटिया भुतडा शाळेने असाच प्रकार केल्यावर शाळा मुख्याध्यापक व इतर दोघांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला तसाच गुन्हा सदर शाळे विरुद्ध दाखल करण्यात यावा अशी मागणी नितीन दळवी यांनी केली आहे, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे