मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
काल रात्री पाकिस्तानने भारताच्या विविध सैन्य ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संरक्षण यंत्रणांनी या सर्व हल्ल्यांना यशस्वीरीत्या निष्फळ ठरवलं. मात्र, शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करत पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला दहशतवादी चेहरा दाखवला आहे.
आज सकाळी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला — .
"पाकिस्तानचा दहशतवाद आता सहन केला जाणार नाही.
प्रत्येक कृतीला आता जशास तसे उत्तर दिलं जाईल."
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की भारतीय सशस्त्र दलांनी पहाटे पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी केंद्रांवर लक्ष केंद्रित करत हल्ला चढवला. लाहोरमधील एक अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम उद्धवस्त करण्यात आली आहे.