हैदराबाद व बेंगलोर सुद्धा लवकरच सुरू होणार.
सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
दि. १५ जून २०२३ ला होटगी रोड विमानतळातील मुख्य अडथळा असलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पडून येत्या १५ जूनला दोन वर्षे पूर्ण होतात परंतु सरकारी अनास्था व प्रशासनाने केलेल्या अक्षम्य दिरंगाईमुळे होटगी रोड विमानतळाची कामे रखडलेली होती व ती पूर्ण झाल्यानंतर सुद्धा येथून तात्काळ विमान सेवा सुरू करण्याबाबत येथील लोकप्रतिनिधी व संबंधित विभागांनी कोणतीही तत्परता दाखवलेली नाही त्यामुळे सोलापूरकरांच्या मनामध्ये सोलापुरातून विमानसेवा सुरू होणार की नाही याबाबतीत जी शासंकता आहे ती आता दूर झालेली आहे.
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या २६ मे रोजी फ्लाय ९१ कंपनीतर्फे सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होणार अशी ग्वाही दिलेली होती. त्याआधी सुद्धा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अनेक लोकप्रतिनिधींनी वारंवार अशी खोटी आश्वासने दिलेली होती. परंतु सिद्धेश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकमा बाबत उच्च न्यायालयातील याचिका करते व सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी आज फ्लाय ९१ कंपनीचे अधिकारी आशुतोष चिटणीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधून याबाबतची स्पष्टता जाणून घेतलेली आहे. त्यावेळेस त्यांनी सोलापूर ते गोवा फ्लाय ९१ कंपनीतर्फे विमानसेवा देण्यात येईल परंतु ती २६ मे रोजी चालू होणार नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यानंतर दुसरी विमान कंपनी हैदराबाद व बेंगलोर येथे विमानसेवा देण्यासाठी उत्सुक आहे व ती सुद्धा सुरू होईल.
चिमणीचे पाडकाम झाल्यानंतर सोलापूर विचार मंचच्या डॉ. संदीप आडके यांनी सातत्याने भारतातील सर्व विमान कंपन्यांना व सर्व संबंधित विभागांना वारंवार पत्र व्यवहार करून सोलापूरची विमान सेवा मुंबई, हैदराबाद, बेंगलोर, नवी दिल्ली , अहमदाबाद,मद्रास ,चेन्नई, गोवा व तिरुपती या ठिकाणी सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत.
प्लाय ९१ या कंपनीस व त्याचे प्रमुख मनोज चाको यांना सोलापुरातून गोवा व मुंबई अशी विमानसेवा देण्याबाबत सुद्धा सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. त्यामध्ये सोलापूर मध्ये उपलब्ध असलेल्या सोयी व सोलापूरला असलेली विमान सेवेची गरज हे पटवून दिल्याने अनेक कंपन्यांनी येथून विमानसेवा सुरू करण्यासाठी उत्सुकता दर्शवलेली आहे. फ्लाय ९१ कंपनीने आज सुरुवातीला फक्त सोलापूर ते गोवा विमान सेवा देऊ शकेल अशी अधिकृतरित्या ग्वाही दिलेले आहे.
सोलापूरची विमानसेवा लवकरच सुरू होण्यासाठी येथील सर्व नागरिक, उद्योजक व व्यावसायिकांनी सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली असती तर सोलापूर वर अशी उपेक्षित राहण्याची वेळ आली नसती. चिमणी चा अडथळा काढण्यापासून ते विमान सेवा सुरू होण्यापर्यंत गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्याने थेट पंतप्रधान व सरन्यायाधीशांपासून सर्व स्तरावर प्रयत्न करून सोलापुरातील काही मंडळींच्या चुकीच्या वागण्यामुळे आपण केलेल्या सर्व प्रयत्नांवर विरजण पडत असल्याची खंत सोलापूर विचार मंचचे डॉ. संदीप आडके यांनी व्यक्त केली.
नागरी उदयन राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात येऊन २३ डिसेंबर पासून सोलापूर ते गोवा व मुंबई विमान सेवा सुरू होण्याची ग्वाही दिल्यानंतर काही उत्साही लोकांनी त्यांचा सत्कार केला होता परंतु ती विमानसेवा सुरू न झाल्यावर त्यांना कोणीही त्याचा जाब विचारला नाही, परंतु ती गोष्ट आम्ही सोलापूर विचार मंच तर्फे केली.
चिमणी हटवण्यासाठी कोर्टातील दावे व सर्व संबंधित विभागांशी सातत्याने विमान सेवा सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये काहीही हातभार न लावता सोलापूरची विमानसेवा आमच्यामुळे सुरू होत आहे हे श्रेय घेण्यामध्ये अनेक जण पुढे आलेले दिसत आहेत हे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे व आशा प्रवृत्तीमुळेच मागील काही वर्षात सोलापूरची अधोगती झालेली आहे.